Rajya Sabha PM Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : 10 पूर्ण झाली, 20 वर्षे बाकी; मोदींचा हल्लाबोल, विरोधकांचा बहिष्कार

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारी लोकसभेत झालेल्या प्रचंड गदारोळाप्रमाणे राज्यसभेतही विरोधकांकडून घोषणाबाजी केली जात होती. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना बोलू द्यावे, खोटे बोलू नका, अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात होत्या. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.

विरोधकांच्या गोंधळातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच सरकारने केलेल्या कामांची मांडणीही करत आहे. काही लोक म्हणत आहेत आमचे सरकार एक तृतियांश बहुमताचे आहे. हे खरे आहे सरकारने मागील दहा वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता पुढील 20 वर्षे बाकी असल्याचे सांगत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

जाणीवपूर्वक जनतेच्या निर्णयाला नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मागील दोन दिवसांपासून पाहतोय की लोक आता पराभव स्वीकार करत आहेत आणि निराश मनाने विजयही स्वीकारत आहेत, असा टोला मोदींनी लगावला.  

देशातील जनतेने दिलेला निर्णय हे पचवू शकत नाही. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले. मी देशाचा सेवक आहे. देशवासियांना मला हिशेब द्यायचा आहे. माझे ते कर्तव्य आहे, असे मोदी यांनी विरोधकांच्या बहिष्कारावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT