Narendra Modi And Hinduttva :
Narendra Modi And Hinduttva : Sarkarnama
देश

Narendra Modi And Hinduttva : आरएसएस' म्हणते, 'मोदींचा करिश्मा आणि हिंदुत्व निवडणूका जिंकण्यासाठी पुरेसे नाही !'

सरकारनामा ब्यूरो

RSS Analysis on Narendra Modi And Hinduttva : कर्नाटक नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. पण हा पराभव धक्कादायक नसला तरी आश्चर्यचकित करणारा नक्कीच होता. या पराभवावर अनेक तर्कवितर्क काढण्यात आले. पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या द ऑर्गनायझर या नियतकालिकात एक महत्त्वाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्व हे दोनच मुद्दे भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी स्थानिक पातळीवर खंबीर नेतृ्त्व आणि सुशानसनाचीही जोड असायला हवी. असे द ऑर्गनायझर या नियतकालिकात सांगण्यात आले आहे. मोदींचे नेतृत्व, त्यांची प्रतिमा आणि हिंदुत्व हे भाजपची विचारधारा सांगणारे मुख्य मुद्दे आणि जमेची बाजू आहेच. पण आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवरही उमद्या आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. इतकेच नव्हे तर जनतेपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोचविणाऱ्या सुशासनाचीही याला जोड देणे आवश्यक आहे. असल्याचे या नियतकालिकात म्हटले आहे.

कर्नाटकची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल, की ज्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याला जनतेपुढे उत्तर देण्याची वेळ भाजपवर आली. भाजपने आपली विचारधारा, केंद्रीय योजनांचे लाभ आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर कर्नाटकमध्ये ही निवडणूक नेण्याचा प्रयत्नही केला.पण काँग्रेसने मात्र स्थानिक मुद्द्यांवरच ही निवडणूक केंद्रित ठेवली. याचाच परिणाम म्हणजे या निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला,असे स्पष्ट मत संपादक प्रफुल्ल केतकर यांनी या विश्लेषणात मांडलं आहे.

"निवडणुकांमध्ये कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले, पण भाजपच्या मतांमध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसले नाही. निवडणुकीआधी काही आठवडे प्रचारा दरम्यान, हिंदू गट आणि इतर अपक्षांकडून हिजाब, मणिपूर हिंसाचार आणि अन्य मुद्दे उपस्थित करण्यात आले. पण तरीही भाजपने राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचाराचा रोख कायम ठेवला. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र स्थानिक मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित केले. पण, भाजपच्या मंत्र्यांच्या कारभाराविरोधात जनतेमध्ये असणारी नाराजी ही भाजपच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असेही या लेखात सांगण्यात आले आहे.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळालं. यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणूका जिंकण्यासाठी विरोधकांचं मनोधैर्यही उंचावले आहे. परंतू , भाजपला या पराभवाचे योग्य विश्लेषण व चिंतन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आगामी निवडणुकांमध्ये या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची भाजपने काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही या लेखात देण्यात आला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT