Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News Sarkarnama
देश

Shivsena Symbol News : शिंदेंनी निवडणूक आयोगात वेळेवर टाकला डाव; ठाकरेंची कोंडी? : लेखी युक्तीवादातील महत्त्वाचा मुद्दा समोर

Amol Jaybhaye

Eknath Shinde, Uddhav Thackeray News : शिवसेना पक्षा संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु आहे. त्या संदर्भात आयोगाने दोन्ही गटांना लेखी म्हणने मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी आज (ता.३० जानेवारी) लेखी युक्तीवाद सादर केला. निवडणूक आयोगात ठाकरे गटाचा 112 पानांचा आणि शिंदे गटाने 124 पानांचा युक्तिवाद सादर केला.

आज लेखी युक्तिवाद सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही गटांनी आपला युक्तिवाद सादर केला. या युक्तीवादामध्ये शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रीय कार्यकारीनीतील सदस्य आपल्या बाजूला अधिक असल्याचे सांगितले होते. त्यावर शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारीनील 282 पैकी 199 लोक आपल्या बाजूला आहेत, असा दावा केला आहे. अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

त्यामध्ये 40 शिवसेना नेते, 6 उपनेते, 13 खासदार, 40 आमदार, 49 जिल्हाप्रमुख, 87 विभाग प्रमुख असे एकूण प्रतिनिधी सभेतले 282 पैकी 199 लोक आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांमुळेच आमदारांना परराज्यात जावे लागले. राऊत यांच्यापासून आमदारांच्या जीवाला धोका होता, असा दावा शिंदे गटाने केला आहे.

राऊत हे सातत्याने आमदारांना मारण्याच्या धमक्या देत होते. 'आमदार महाराष्ट्रात परतणे व फिरणे कठीण होईल, जे आमदार निघून गेले आहेत त्यांना सभागृहात येऊ द्या. मग बघू, अशा धमक्या राऊत यांनी दिल्या होत्या, त्यामुळे आमदार परराज्यात थांबले, असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या लेखी उत्तर काय?

ठाकरे गटाने दिलेल्या लेखी उत्तरात शिवसेना (Shivsena) पक्षातील बंडखोरी तारखेसह मांडली आहे. एकानाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नेमकी कशी बंडखोरी केली याबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ठाकरे गटाने आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये मांडले मुद्देच लेखी उत्तरातही मांडण्यात आले आहे.

शिंदे यांच्याकडे असणारे मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने मांडला आहे. शिंदे यांना शिवसेनेची घटना यापूर्वी मान्य होती. मात्र, आताच नेमकं काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शिंदे यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे पक्ष आमचाच आहे, असा दावा करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून रद्द करण्यात आले होते, असेही यामध्ये म्हटले आहे. 10 व्या शेड्युल नुसार या लोकांनी पक्ष सोडला, त्यामुळे ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी या विषयी माध्यमांना माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणाले, संपूर्ण घटनाक्रम हा 20 जून पासून सुरु झाला आहे. तेव्हापासून ते गेली सुनावणीपर्यंतच्या घटनाक्रमाविषयी माहिती सादर करण्यात आली आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद करण्यात आला, याबाबतही म्हणणे मांडण्यात आले, असे देसाई यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT