Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Supreme Court Judgement: राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल 15 मेपर्यंत आलाच नाही तर काय घडणार? सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court News : महाराष्ट्रातील संत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एखाद्या प्रकरणातील सूनावणी सर्वोच्च न्यायालायने पूर्ण केल्यानंतर त्यातील निकाल राखीव ठेवला तर तो निकाल येण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यापेक्षाही अधिक वेळ लागू शकतो. मात्र, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ होते. त्यातील एक न्यायमूर्ती एम. आर. शहा हे १५ मेला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल १५ मे पर्यंत येवू शकतो, असे सांगितले जात आहे.

कारण कोणतेही न्यायामूर्ती निवृत्त होत असतील तर ते त्यांनी ज्या प्रकरणाची सुनावणी केली. त्याचा निकाल द्यावा लागतो. कारण त्या निकाल पत्रावर त्यांची सही असेत. तसेच ते निकालपत्र न्यायालयात सादर करावे लागते. त्यामुळे १५ मेच्या आत या प्रकरणाचा निकाल येईल असे असे सांगितले जात आहे.

मात्र, काही कारणाने जर समजा या प्रकरणाचा निकाल १५ मेच्या आत आलाच नाही तर काय होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर या प्रकरणाचा निकाल १५ मे पर्यंत आला नाही तर काय होईल याचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) ज्येष्ठ वकील शिंदे यांनी दिले आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले, या प्रकरणाचा निकाल १५ मे पर्यंत येईल.

जर समजा काही कारणास्तव निकाल आला नाही तर या प्रकरणात न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या जागी दुसऱ्या न्यायमूर्तींची नियुक्ती करावी लागले. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा ऐकावे लागले, आणि त्यानंतर निकाल येईल. असे होणार नाही, असेही शिंदे म्हणाले. कारण या आधी असे एकही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नाही. स्थानीक न्यायालयांमध्ये असे प्रकार घडले असल्याचेही त्यांनी नमुद केले.

सत्तासंघर्षाचे प्रकरण अनेक दिवस प्रलंबित होते. त्यानंतर या प्रकरणात सलग आठवड्यातील तीन-तीन दिवस सूनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनीही वकिलांना युक्तीवाद करत असताना वेळेची मर्यादा घातली होती. तसेच हे प्रकरण लवकरात लवकर संपवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल आता १५ मे च्या आता येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT