Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee: पाचव्या टप्याच्या मतदानापूर्वीचं ममता बॅनर्जींची मोठी घोषणा; इंडिया आघाडीचे सरकार आले तर..

सरकारनामा ब्यूरो

West Bengal News : लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टपा सुरु आहे.निवडणुकीच्या धामधुमीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले तर आमचा पक्ष बाहेरून पाठिंबा देईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. देशात इंडिया आघाडीचं सरकार आले तर ममता बॅनर्जी या सरकारमध्ये नसणार, हे स्पष्ट झाले आहे.

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी त्यांना CAA, NRC आणि UCC मागे घेण्यास सांगेन, असे त्यांनी म्हटलं आहे. त्या एका प्रचार सभेत बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांचा TMC पक्ष लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षाची काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी लढत आहे. गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये आमचा भाजपला पाठिंबा नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बंगालमध्ये माकप आणि काँग्रेसवर विश्वास ठेवू नका, असेही त्या म्हणाले. दोन्ही पक्ष आमच्यासोबत नाही, ते भाजपसोबत आहेत, असे बॅनर्जी म्हणाल्या. अनेक पक्ष चोरणार भाजप हा चोर पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे 400 पारचे उद्धिष्ट गाठता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

भाजप 400 जागा जिंकेल असा दावा करीत आहे, पण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देईन. भाजप हा चोरांनी भरलेला पक्ष आहे, हे साऱ्या देशाला माहित आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर आम्ही त्यांना बाहेरुन पाठिंबा देऊन मदत करु, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT