Amit Shah, Rahul Gandhi
Amit Shah, Rahul Gandhi sarkarnama
देश

राहुल गांधींच्या 'भारत जोडो' विरोधात स्वत: अमित शहा मैदानात

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : 'राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत' असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केला आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो' यात्रेवर भाजपने जोरदार शाब्दीक हल्ले सुरू केले. राहुल गांधी यांनी एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाची भेट घेण्यावरून भाजपने (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. आता तर खुद्द शहा हेच मैदानात उतरले आहेत.

शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले की राहुल बाबा नुकतेच भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहे. राहुल बाबा आणि काँग्रेसजनांना त्यांच्या संसदेतील भाषणाची मी आठवण करून देतो. राहुल बाबा तेव्हा म्हणाले होते की भारत हे राष्ट्र नाही. अहो राहुल बाबा, कुठली पुस्तके वाचलीत? मॉं भारती हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे, असा हल्लाबोल शहा यांनी केला आहे.

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी भारत जोडो यात्रेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ही यात्रा म्हणजे वास्तवात एक 'द्वेषपूर्ण मोहीम' असल्याचे म्हटले की "आज काँग्रेसने जॉर्ज पोनय्या यांना भारत जोडो यात्रेचा पोस्टर बॉय बनवले आहे. हा तोच माणूस आहे जो हिंदूंना धमक्या देतो आणि भारतमाते बद्दल अपमानास्पद बोलतो. शहजाद पूनावाला म्हणाले, काँग्रेस पक्षाला हिंदूविरोधी असल्याचा मोठा इतिहास आहे. राहुल गांधी 'हेट पेअर' प्रचारात गुंतले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोन्नय्या यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याशी चर्चा करताना राहुल यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर पक्ष प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधींच्या पक्ष आणि भारत जोडो यात्रेदरम्यान नवरात्रीच्या आधी मा शक्ती, मा भवानीचा अपमान करणारा व्हिडिओ समोर आला आहे. हे काही पहिल्यांदाच घडत नाही. यापूर्वीही असे अनेक प्रसंग आले आहे. काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी हिंदू धर्माविरुद्ध अनेक वेळा अशोभनीय गोष्टी बोलल्या आहेत, मग तो प्रभू राम किंवा माता शक्तीला नकार देण्याचा विषय असो. याच राहुल गांधींना निवडणुकीच्या काळात मंदिरात जावे लागते आणि त्यासाठी एक मुखवटाही तयार केला जातो असेही पात्रा यांनी म्हटले आहे.

राजस्थान सरकारच्या १० दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे काय झाले? तरुणांना ३५०० रुपयांच्या बेरोजगार भत्त्याचे काय झाले? २० लाख तरुणांना रोजगार देण्याचे काय झाले? काँग्रेस केवळ पोकळ आश्वासने देऊ शकतो. हा पक्ष आश्वासने पूर्ण करू शकत नाही, असे रोखठोक सवाल करत शहा यांनी टीकास्त्र सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT