जिल्हा

गारपीटीमुळे चिखलदरा महोत्सव रद्द 

सरकारनामा ब्युरो

अमरावती : जिल्ह्यात गारपीट व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन चिखलदरा महोत्सव रद्द करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिले. त्यानुसार महोत्सव रद्द करण्यात आला असून, त्याच्या आयोजनासाठी राखीव ठेवलेला निधी अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. 

जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व चिखलदरा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा पर्यटन महोत्सव साजरा केला जातो. त्याच्या आयोजनाची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पाच फेब्रुवारीला झाली होती. तथापि, त्यानंतर जिल्ह्यात, तसेच चिखलदरा तालुका व परिसरात अतिवृष्टी व गारपीट होऊन शेतमालाचे आणि शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यातील अंदाजे 45 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी दिले. त्यानुसार महोत्सवाच्या आयोजनासाठी राखीव ठेवलेला निधी हा अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT