आमदार गोरेंनी केली "उरमोडी'च्या पाण्यात आंघोळ! 
आमदार गोरेंनी केली "उरमोडी'च्या पाण्यात आंघोळ!  
जिल्हा

आमदार गोरेंनी केली "उरमोडी'च्या पाण्यात आंघोळ! 

सरकारनामा ब्युरो

सातारा : उरमोडीचे पाणी माण-खटाव तालुक्‍यात आणण्याचे आश्‍वासन आमदार जयकुमार गोरे यांनी दिले आणि ते प्रत्यक्षात आलेही. उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आले की आनंदोत्सव साजरा केला जातो. यावेळीही आमदार गोरे यांनी या पाण्यात आंघोळ करत आनंदोत्सव साजरा केला. 

माण तालुक्‍यात नरवणे येथे उरमोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पोहोचले. या पाण्याचे जलपूजन आमदार गोरेंसह परिसरातील ग्रामस्थ व महिलांनी केले. मुळात उरमोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केलेल्या वाढीव विद्युतभाराची जोडणी करावी, यासाठी गोरेंनी उपोषणाचा इशारा दिला होता. पण महावितरणच्या मुंबई व बारामती येथील अधिकाऱ्यांनी गोरेंच्या इशाऱ्याची दखल घेत तातडीने जोडणी केली. माण-खटावमध्ये अधिक क्षमतेने पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला. हे पाणी नरवणे येथे आल्यानंतर ग्रामस्थांसह आमदार गोरे यांनी जलपुजन करून जनतेला निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT