जिल्हा

शेतकरी कर्जमुक्तीसाठी अकोल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक 

सरकारनामा ब्युरो

अकोला : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत शनिवारी (ता.दहा) शेकडो शेतकऱ्यांसह मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस शांत बसणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी दिला. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सत्ताधारी भाजप सरकार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न करता निव्वळ आश्वसनांच्या खैराती वाटून जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांना चॉकलेट देण्याचे काम करीत आहे. कर्जमुक्तीच्या मागणीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी गत महिनाभरापासून जिल्ह्यातील गावो-गावी फिरून कर्जमुक्ती आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडेतोड टिका करीत ग्रामीण भागात कर्जमुक्तीचे आंदोलन अधिक तीव्र केले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सरकारला बळीराजाची सनद सोपवित कर्जमुक्ती करण्याच्या मागणीसाठी सातही तालुक्‍यासह जिल्हास्तरावर अकोल्यात मोर्चा काढण्यात आला. गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी आमदार तुकाराम बिरकड, महानगराध्यक्ष अजय तापडिया, श्रीकांत पिसे पाटील, नगरसेविका उषा विरक, संग्राम गावंडे, युवराज गावंडे, दिलीप आसरे, यांच्यासह पदाधिकारी व शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची मागणी केली. जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य नसताना मोर्चात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT