कोल्हापूर

तुकाराम मुंढेंना साखर आयुक्‍त करा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : नाशिक महापालिकेचे माजी आयुक्‍त तुकाराम मुंढेंना साखर आयुक्‍त करावे,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य असलेले स्वाभिमानीचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊस दर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष असलेल्या मुख्य सचिवांकडे एका पत्रादवारे ही मागणी केली आहे. 

'राज्यातील साखर कारखानदारावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. या उद्योगात साखर कारखानदारांची मनमानी कारभार करत आहेत. साखर उद्योगाच्या माध्यमातून राजकारणात प्रस्थापित असलेली ही मंडळी शेतकऱ्याला दर देताना मात्र कुचराई करत आहेत. या साखर उद्योगाला राज्य शासनाकडून वेळोवेळी पॅकेज दिले जाते. मात्र त्याचा वापर योग्य होताना दिसत नाही. या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळालेला नाही. साखर कारखानदार हे शासनाला जुमानत नसल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर दिसत आहे.', असे या पत्रात म्हटले आहे. 

'हा साखर उद्योग रसातळाला जाण्यापूर्वी त्यावर नियंत्रण आणणे आवश्‍यक आहे. यासाठीच तुकाराम मुंढे यांना साखर आयुक्‍त म्हणून नेमावे, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे. मुंढे हे साखर आयुक्‍त झाले तर साखर उद्योगातील भ्रष्टाचार कमी होवून त्यास शिस्त लागेल,' असा विश्‍वास या पत्रात व्यक्‍त करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT