सातारा : चीनमधील वूहान मध्ये अडकलेली साताऱ्याची विवाहित आश्विनी पाटील यांना भारतात तातडीने आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे पत्र साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना पाठविले आहे.
श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्र मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले की, साताऱ्यातील विवाहिता आश्विनी पाटील या चीनमधील वूहान शहरात अडकल्या आहेत. त्यांचा पासपोर्ट वूहान मधील ब्रिटिश राजदूता वासात अडकला आहे. त्यांच्या पतीला पोलंड सरकार घेऊन गेले आहे. त्यामुळे ती एकटीच वूहान मध्ये आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन अश्विनी पाटील यांना मदत करावी आणि त्यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्रमंत्री म्हणून आपण तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.