कोल्हापूर

व्हीव्हीपॅट मशिनमधील सर्व मतदान मोजले तर निकालाला दोन महिने लागतील! 

सुनील पाटील

कोल्हापूर : ''एक्‍झीट पोलनंतर ईव्हीएमवर संशय घेणे व सर्व व्हिव्हीपॅटमधील मतदानाची मोजणी करण्याची विरोधकांची मागणी अनाठायी आहे. प्रत्येक गोष्टीवर संशय घेणे बरोबर नाही. ज्या ठिकाणी भाजप काम चांगले आहे त्याठिकाणी एनडीएचे उमेदवार विजयी होणार. केरळमध्ये आमचे काम चांगले झाले नाही, त्या ठिकाणी कॉंग्रेससह इतर पक्षांच्या जागा जास्त येतील याबद्दल आम्हाला शंका नाही मग तुम्हीच कशा शंका येतात,'' असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या खरीप आढावा बैठकीनंतर श्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

श्री पाटील म्हणाले, ईव्हीएमबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. सर्वोच्य न्यायालयातही दाद मागितली आहे. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. व्हीव्हीपॅट मशिनमधील सर्व मतदान मोजले तर निकाल जाहीर करायला दोन महिने लागतील. 

दरम्यान देशात एनडीएच्या 290, महाराष्ट्रात 44 आणि पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 10 जागा विजयी होतील असा दावाही पाटील यांनी केला. मात्र, या लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या घरातील एकही सदस्य संसदेत जाणार नाही, असा पुनरुच्चारही यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT