कोल्हापूर

आंदोलन भडकावे ही चंद्रकांत पाटलांची इच्छा : प्रकाश आबिटकर 

सदानंद पाटील

कोल्हापूर : राज्यभर मराठा समाजाचा आरक्षणासाठी आक्रोश सुरू आहे. अशा काळात आंदोलनकर्त्याबरोबर चर्चा करण्याचे सोडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आंदोलन चिघळवणारी भाषा करत आहेत, अशी टीका राधानगरी भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. 

आमदार आबिटकर म्हणाले, राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. तो रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने हालचाल करणे आवश्‍यक होते. या सर्व प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांपेक्षा मंत्री पाटील यांच्यावर अधिक विश्वास असल्यानेच त्यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद आहे. मराठा समाज अधिक आक्रमक असताना मंत्री पाटील यांनी आंदोलन कर्त्यांसोबत चर्चा करणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता हे आंदोलन अधिक भडकेल, अशी विधाने मंत्री पाटील करत आहेत, हे योग्य नसल्याचे आमदार आबिटकर म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT