NCP State President Jayant Patil
NCP State President Jayant Patil 
कोल्हापूर

सरकार स्थापनेबाबत 'या' वक्तव्यातून जयंत पाटलांना काय सुचवायचेय?

धर्मवीर पाटील

इस्लामपूर : आपले सरकार येणार आहे या आनंदात राहू नका आणि नाही आले म्हणून दुःखही करू नका, या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. राजकारणात कशावरही विश्वास ठेवायचा नसतो, असेही ते म्हणाले.

राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या ५१ व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमासाठी आज ते इस्लामपुरात आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, "राज्य सरकार सत्ता स्थापनेच्या पातळीवर ज्या हालचाली सुरू आहेत, त्याबाबत आपण आताच स्वप्न बघणे योग्य नाही. बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. आज दिल्लीत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा होईल. त्यानंतर पुढची पावले पडतील.''

ते पुढे म्हणाले, ''कदाचित उद्या संध्याकाळी मलाही दिल्लीला जावे लागण्याची शक्यता आहे. तिथे काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल, त्यात आणखी दोन पावले पुढे पडतील. राजकारणात कशावरही विश्वास ठेवायचा नसतो. कार्यकर्त्यांनी आपल्या मनासारखे झाले नाही म्हणून दुःख करून घेऊ नये; पण झाले म्हणून जास्त आनंदही मानू नये. मनासारखे झाले नाही तर आपण सक्षम विरोधक म्हणून चांगले काम करू."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT