कोल्हापूर

कागलमध्ये मुस्लिमांची पाच घरेही नाहीत, तरी हसन मुश्रीफ आमदार होतात!

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कागलमध्ये मुस्लिम समाजाची पाच घरेही नाहीत, तरी हसन मुश्रीफ आमदार म्हणून निवडणून येतात. मुश्रीफ हे कट्यावरचा नेता आहेत. खऱ्या अर्थाने हा पुरोगामी जिल्हा आहे, असे मत कॉंग्रेस नेते, आमदार पतंगराव कदम यांनी यांनी मांडले. 

कळंबा येथील तपोवन मैदानावर सुरु झालेल्या "सतेज कृषीदर्शन 2017'च्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. 

हसन मुश्रीफ यांचे कौतुक करत असताना पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका केली. ते म्हणाले, कॉंग्रेसने राज्यात अनेक ठिकाणी आघाडी केली. फक्‍त कोल्हापूरातील आघाडी बरोबर चालली आहे. पुण्यातली आघाडी चालली नाही कारण राष्ट्रवादीचे लोक लबाडी करतात. कोल्हापूरात मात्र ठरल्याप्रमाणे चालले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा दररोज घोषणा करायचे की भाजपचाच महापौर होणार पण, आमदार मुश्रीफ आणि आम्ही एकत्र आलो आणि पाचच मिनिटात निर्णय झाला. त्यामुळे कोल्हापूरा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे चांगले चालले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT