Raju-Shetty-Swabhimani.
Raju-Shetty-Swabhimani. 
कोल्हापूर

मी कुठे चुकलो हे मला कानाला धरुन जनतेने दाखवायला हवे होते: राजू शेट्टी

सरकारनामा

तुरुकवाडी ( कोल्हापूर ) : "संसदेत नसलो तरी बेहत्तर, शेतकऱ्यांच्या शिवारात मात्र नक्की दिसेन. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी लढेन," अशी ग्वाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

" मी कुठे चुकलो हे मला कानाला धरुन जनतेने दाखवायला हवे होते. माझ्याबद्दल तुमच्या मनात नाराजी का? कुठे चुकलो असेल तर सांगा, मला समजायला हवे. गेल्या दोन खेपेस खासदार म्हणून संसदेत निवडून जात असताना शाहूवाडी विभागातील लोकांनीच मला उच्चांकी मते दिली. तुमचे हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही."

 विरळे (ता. शाहूवाडी) येथील दिपकृष्ण ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी आमदार डॉ. विनय कोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वागत व प्रस्ताविक कानसा-वारणा फाउंडेशनचे राज्यअध्यक्ष दीपक पाटील यांनी केले.

डॉ. विनय कोरे म्हणाले,"गावशिवार ते थेट संसद असा अभिमानास्पद राजकीय प्रवास करणाऱ्या राजू शेट्टींची अस्तित्वासाठी लढणाऱ्यांचा आधार अशी संपूर्ण देशभर ओळख आहे. चिंतन आणि संघर्ष ही त्यांची जमेची बाजू आहे. वारणा नदीमुळेच पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ हे तालुके विकासाच्या प्रक्रियेत आघाडीवर आलेत. अशावेळी शाहुवाडीच्या विकासातच का अडथळे येत आहेत.''

यावेळी कर्णसिंह गायकवाड, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, बाजार समिती सभापती बाबासो लाड यांनी  मनोगत व्यक्त केले . पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, बबनराव पाटील, बंडा पाटील-रेठरेकर, दिलीप पाटील, केशव पाटील, अशोक पाटील, शिवाजी पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच कृष्णा पाटील यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT