Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
कोल्हापूर

शिल्लक ऊसावर तोडगा; कारखान्यांना टनाला दोनशे रूपये रिकव्हरी लॉस देणार...अजित पवार

सरकारनामा ब्युरो

सोलापूर ः राज्यात सध्या ऊसाचे मोठं संकट उभे असून आम्ही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. एक मे नंतर जे कारखाने ऊस आणतील त्यांना टनाला दोनशे रूपये रिकव्हरी लॉस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ५० किलोमीटरच्या पुढच्या ऊसाला पाच रूपये प्रतिकिलोमीटर दिले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त कृतज्ञता व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ''सध्या राज्यात ऊसाचे मोठं संकट आपल्यासमोर उभे आहे. पण, आम्ही महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. ''

''एक मेनंतर जे कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस आणतील त्या कारखान्यांना रिकव्हरी लॉस म्हणून टनाला दोनशे रूपये कारखान्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 50 किमीच्या पुढचा ऊस असेल तर पाच रुपये प्रतिकिमी दिले जातील. राज्यातील ऊसाचे एक कांड शिल्लक राहू देणार नाही, असा विश्वास व्यक्त करून हा निर्णय आम्ही कारखानदारांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी घेतला आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT