Shahu-Maharaj
Shahu-Maharaj 
कोल्हापूर

शाहू महाराज म्हणतात ...राज्याची वाट पुरोगामी की प्रतिगामी ?

सदानंद पाटील

कोल्हापूर : " छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तर राजर्षी शाहू महाराजांनी त्याच्यावरती आधुनिकतेचा कळस चढवला .या दोन महापुरुषांनी दिलेल्या पुरोगामीत्वाच्या विचारांची गरज  आज राज्य आणि देशाला आहे. असे असेल तरी, सध्या आपली वाट पुरोगामी आहे की प्रतिगामी, हेच तपासण्याची वेळ आली आहे",  असे  प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

आपले कोल्हापूर नेहमीच पुरोगामी राहिले आहे. हीच दिशा योग्य आणि प्रगतीपथावर नेणारी आहे. या विचारांशीवाय दुसरा पर्याय नाही. पुरोगामी विचाराने गेलो तर जिल्ह्यासह राज्याचे प्रश्न सोडवू शकतो. यासाठी सर्वांनी आपले व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून एकसंघ होऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन शाहू महाराज यांनी केले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT