Shahu-Maharaj
Shahu-Maharaj 
कोल्हापूर

शाहूंचे भक्त फार झाले, पण अनुयायी फार कमी झाले!

युवराज पाटील

कोल्हापूर : स्मारके ही स्फूर्ती देण्यासाठीच असतात. राजर्षी शाहू महाराजांच्या कामांचा, पर्यायाने त्यांनी घालून दिलेल्या विकासाचा वारसा पुढे नेण्याचे काम नेत्यांनी करावे आणि लोकांनी त्यास साथ द्यावी, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज व्यक्त केली. शाहूंचे भक्त फार झाले; पण अनुयायी फार कमी झाले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता. 19) होत आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला 'सकाळ'ने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याशी संवाद साधला. स्मारकाच्या रूपाने दसरा चौक येथे लोकांनी पहिल्यांदा शाहू महाराजांचा पुतळा उभारला, असे सांगून ते म्हणाले, "प्रचंड दूरदृष्टी लाभलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी एकही क्षेत्र असे सोडले नाही, ज्यात विकासाचे काम केले नाही. आजकाल कनेक्‍टिव्हिटीवर चर्चा होते. त्या वेळी रेल्वे करताना कनेक्‍टिव्हिटी आणि त्यातून विकासाचा दृष्टिकोन महाराजांनी ठेवला होता. सध्या मेट्रोचा बोलबाला सुरू आहे. कोल्हापुरातही भविष्यात ती कशी धावेल, यासाठी आतापासून प्रयत्न व्हायला हवेत.''

ते म्हणाले, "शाहू मिलमधील नियोजित स्मारकाबाबत गेल्या पाच वर्षांत काहीही हालचाल झालेली नाही. सर्वांनी विचारविनिमय करून त्यातून मार्ग काढावा. कोल्हापूरची नैसर्गिक वाढ होत गेली; पण अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. रस्ते आजही अरुंद आहेत. सर्व प्रश्‍नांच्या मुळाशी नेत्यांनी जावे. ते सोडविण्यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवावा आणि लोकांनीही नेत्यांना साथ द्यावी.''


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT