Ajit Pawar Phone Call .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Accident: मोठी बातमी: अजितदादांचा अपघाताआधी शेवटचा फोन भाजप नेत्याला; म्हणाले, 'बारामतीत उतरल्यावर...'

Ajit Pawar Passes Away : अजित पवार बुधवारी (ता.28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या सभेसाठी विमानाने रवाना होते. त्यांची सकाळी 11 वाजता बारामतीत सभा होणार होती.याच सभेसाठी बारामतीत पोहोचल्यानंतर लँडिंगदरम्यानच हा विमानाचा भीषण अपघात घडला.

Deepak Kulkarni

Baramati News : महाराष्ट्रासाठी बुधवारचा (ता.28)दिवस अतिशय धक्कादायक ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये अकाली निधन झालं.या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पण या बारामतीतील विमान अपघाताआधी अजितदादांचा शेवटचा फोन हा भाजप आमदाराशी झाल्याची माहिती समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शेवटचा फोन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना केला होता. यावेळी हाच त्यांचा हा अखेरचा फोन ठरल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी अजितदादा आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी बारामतीमध्ये विमान लँडिंग झाल्यानंतर पुढच बोलणं होणार होतं,अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अजित पवार बुधवारी (ता.28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या सभेसाठी विमानाने रवाना होते. त्यांची सकाळी 11 वाजता बारामतीत सभा होणार होती.याच सभेसाठी बारामतीत पोहोचल्यानंतर लँडिंगदरम्यानच हा विमानाचा भीषण अपघात घडला. याचदरम्यान, अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार आणि भाचा राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी झाला होता.

विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार होतं. सध्यातरी अजित पवार आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी नेमका काय संवाद साधला याची अपडेट समोर आलेली नाही. पण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आत्या आहेत.

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले,या घटनेनं मन अक्षरशः सुन्न झालं आहे. अपघात होण्याच्या काहीवेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्याक्षणी काय वाटलं, ते शब्दांत मांडणं खूप कठीण असल्याची भावना पाटील यांनी म्हटलं.

तसेच क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं,याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे,माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते. त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे,अजूनही विश्वास बसत नाही, अजितकाका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही,असं भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले.या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

राणा जगजितसिंह पाटील म्हणाले,आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे.काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे,धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे,ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी असल्याचं पाटील यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी लहानपणापासून राजकारण,समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं. व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे, ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले, असं भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT