MNS and MVA Satyacha Morcha Mumbai Sarkarnama
महाराष्ट्र

MNS and MVA Satyacha Morcha Mumbai : सपकाळ नसेल म्हणून काय झालं, मैं हूँ ना; सत्याच्या मोर्चात थोरातांनी ठोकलं पहिलं भाषण

Balasaheb Thorat First Speech at MNS MVA Satyacha Morcha Mumbai : मुंबईतील मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी भाषण केले.

Pradeep Pendhare

Balasaheb Thorat Congress leader : मुंबईतील सत्याचा मोर्चात काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून, बाळासाहेब थोरात यांनी पहिलं भाषण केले.

'राहुल गांधी यांनी मत चोरी आणि मतदार याद्यांतील घोळांचा मुद्दा मांडल्यानंतर, हा वणवा पेटला आहे, हे सांगताना, संगमनेर मतदारसंघात साडेनऊ हजार मतदार बोगस असल्याचा दावा केला. एका मतदारसंघात एवढे, तर संपूर्ण महाराष्ट्रात किती असतील, असा प्रश्न करताना, मतदार याद्यांचे संपूर्ण शुद्धीकरण होत नाही. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये,' अशी आग्रही मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "हा अभुतपूर्व असा मोर्चा आहे. हा केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग (Election Commission) आणि जे-जे निडवणूक आयोगाला चालवणाऱ्या सत्ता आहेत, त्यांच्यावर हा मोर्चा आहे. राहुल गांधी यांनी दाखवून दिलं की, देशाच्या निवडणुका वोट चोरीमधून होत आहेत."

'राहुल गांधी (Rahul Gandhi) देशाचे विरोधी पक्षनेते आहे. त्यांनी मतदार याद्यांवर शंका उपस्थित केल्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने अतिशय धातूर-मातूर उत्तर दिलं. केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर देशातील सर्वात बोगस उत्तर म्हणून नोंदवलं जाईल. त्यांनी खुलासा केला नाही, चौकशी केली नाही. यानंतर लक्षात आलं की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या बोगसपद्धतीनं आणि बोगस मतदार यादीवर झाल्या आहेत,' असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

विधानसभेतील घोळाची मतदार यादी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरू नका. या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीवर हरकतींवर कारवाई न होता, ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोपही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

निवडणूक आयोग कार्यवाही करत नाही

आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो, आम्हाला निवडणूक आयोग उत्तर देऊ शकले नाही. राज्य निवडणूक आयोगाने देखील उत्तर दिलं नाही. मतदार याद्यांमधील घोळ सांगितले, पण कार्यवाही झाली नाही. हे सांगताना बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या संगमनेर मतदारसंघातील बोगस मतदारांची दाखला दिला.

संगमनेरमधील बोगस मतदार

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात साडेनऊ हजार बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. या बोगस मतदारांवर आम्ही हरकत घेतली. तर तहसीलदार यांनी दुरुस्तींचा अधिकार आम्हाला नसल्याचे लेखी उत्तर दिले. याचाच अर्थ असा आहे की, विधानसभेला वापरली गेलेली मतदार यादी कोणत्याही दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वापरली जाणार आहे, अशी भीती बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

तोपर्यंत स्थानिक निवडणुका घेऊ नका!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना समोर जाताना ही बोगस मतदार यादी दुरुस्ती झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. निवडणूक आयोगाने काल-परवा, पत्र काढून मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण त्या अगोदर नगरपालिकांकरीता मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मतदार यादीच्या दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, अशी माझी आग्रही मागणी आहे, याचा पुनरूच्चार बाळासाहेब थोरात यांनी भाषणाच्या शेवटी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT