Nitesh Rane Sarkarnama
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav vs Nitesh Rane : भास्कर जाधवांना नितेश राणेंनी डिवचले; म्हणाले, 'केवळ सतरंज्या उचलायचे काम...'

Bhaskar Jadhav controversy News : भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला भास्कर जाधव उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का? या बाबत दाबकाय आवाजात चर्चा सुरु आहे. मात्र मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून त्यांची साथ सोडणार नसल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. मात्र तरी देखील भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.

यासंबंधी बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, 'भास्कर जाधव आठ-नऊ वेळा निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेत्याचे नाव पुढे करायचे असताना आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव यांच्यापुढे दुसरा पर्याय उरलेला नाही. भास्कर जाधव यांची तिथून इनिंग संपलेली आहे. त्यांना आता आजूबाजूच्या सतरंज्या, मोबाईल वगैरे उचलणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे.'

आदित्य ठाकरे म्हणजे 'पप्पूचे महाराष्ट्र व्हर्जन' असल्याची टीका देखील नितेश राणे यांनी यावेळी केली.या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील टीका केली. देशात राहुल गांधी जसे भाजप वाढवत आहेत, तसेच काम आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात करत असल्याचे राणे म्हणाले. देशातील राहुल गांधी यांची भूमिका आदित्य ठाकरे महाराष्ट्रात पार पाडत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

सात ते आठ टर्म आमदार राहिलेले भास्कर जाधव हे सिनिअर असताना देखील विरोधी पक्ष नेते पदासाठी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले आहे. म्हणजेच तिकडे भास्कर जाधव केवळ यांना केवळ सतरंज्या उचलायचे काम राहिले आहे. त्यामुळे आता नाराजी शिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसल्याची टीका भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केली. या माध्यमातून नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.आदित्य ठाकरे म्हणजे 'पप्पूचे महाराष्ट्र व्हर्जन' असल्याची टीका देखील त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT