विधानसभेला मतदान न करणाऱ्यांना जाहीर सभेतून इशारा वजा धमकी दिल्या प्रकरणी शिंदेंसेने आमदार अब्दुल सत्तार यांना सिल्लोड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायालयात हजर राहून सत्तार यांनी आपली बाजू मांडावी, असे नोटीसीत म्हटले आहे.
शिंदेंना त्यांचे नगरसेवक भाजप फोडेल, अशी भीती आहे. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना हाॅटेलमध्ये ठेवले आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेंचे नगरसेवक सुरक्षित नाहीत.
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या निकालावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सामनातील सदरातून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत हरामाचा पैसा वापरला आणि सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे हा पैसा होता. आणि याच भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली, अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे व त्यांच्या लोकांकडे ‘कॅश’ म्हणजे रोखीची चणचण भासली व फडणवीस यांना तेच हवे होते. हे खरे असले तरी मुंबईतील त्यांच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी व इतर महानगरपालिकांत 2 कोटी देण्याची कामगिरी शिंदे यांच्या पक्षाने बजावली. मुख्यमंत्र्यांनी 40 हजार कोटींची कामे थांबवली ही शिंदे यांच्या आर्थिक उलाढालीतील लहान घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अमली पदार्थांच्या व्यवहाराचा पैसा पसरला आहे. याच पैशांनी ‘मतदार’ विकत घेतला जातो. हे सर्व भयंकर आहे. नशेच्या गोळ्या व नशेचा पैसा सत्ताधारी घरापर्यंत पोहोचवत आहेत. मग आता राहिले काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
वसंतदादाचे पणतू, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नगरसेवक बनले आहेत. सांगली मधील प्रभाग 11 मधून ते विजयी झाले आहेत.
काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुलला आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये सहभागी होणार आहेत.
अमरावतीत भाजप सध्या युवा स्वाभिमान सोबत जाणार असल्याचं चित्र असलं तरी बहुमताचा आकडा 44 आहे. भाजप आणि युवा स्वाभिमानच्या जागा मिळून 40 होत आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी अजून 4 जागांची गरज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याचा तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता नवी मुंबई भाजपची सत्ता आली आहे. नवी मुंबईची जबाबदारी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईकांना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.