मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी IAS-IPS अधिकाऱ्यांच्या सतत बदल्यांमुळे प्रशासनात खळबळ उडवली आहे.
फक्त 8 दिवसांत 5 IAS अधिकारी हलवले गेले, याआधी 15 ऑगस्टच्या आधीही बदल्या झाल्या होत्या.
गेल्या 9 महिन्यांत शेकडो अधिकाऱ्यांची बदली झाल्याने या हालचालींवर चर्चा रंगली आहे.
Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धडाकाच लावला आहे. गेल्या 9 महिन्यात अनेकांना त्यांनी बदली करून धक्का दिला असून यामुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली होती. त्यातच त्यांनी 15 ऑगस्टच्या तोंडावर पुन्हा एकदा आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. याची चर्चा अद्याप सुरू असतानाच फक्त आठ दिवसांच्या कालावधीत राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून संजय चव्हाण यांची नियुक्ती झाली असून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भुवनेश्वरी एस.यांनी नियुक्ती देण्यात आली आहे. अकोलाच्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान गेल्याच आठवड्यात 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश सरकारने दिले होते. ज्यात डॉ. अशोक करंजकर, संजय कोलते, सुशील खोडवेकर, सावन कुमार, नमन गोयल आणि डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त यांचा समावेश होता.
त्याआधी महिन्याच्या सुरूवातीला तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी चार आयएसएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात मुंढे यांची बदली मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी, नितीन काशीनाथ पाटील यांची महाराष्ट्राच्या राज्य कराचे विशेष आयुक्त तर अभय महाजन यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली होती.
आता सरकारने केलेल्या नव्या बदल्यांमुळे अकोल्याला 2 नवीन IAS अधिकारी मिळाले असून एस. भुवनेश्वरी आणि वर्षा मीना यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेल्या भुवनेश्वरी एस या सन 2015 च्या बॅच आहेत. त्यांनी परिविक्षा कालावधीत कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे उपविभागीय अधिकाटी म्हणून काम केले आहेत.
प्र.१: IAS बदल्यांबाबत चर्चा का सुरू आहे?
उ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पावधीत अनेक IAS-IPS अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
प्र.२: 15 ऑगस्टच्या आधी काय झाले होते?
उ: स्वातंत्र्यदिनी अगोदरच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते.
प्र.३: अलीकडे किती IAS अधिकाऱ्यांची बदली झाली?
उ: फक्त 8 दिवसांत 5 IAS अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.