Buladhana News, 19 Jan : गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कारण याबाबतचं वक्तव्य खुद्द केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलं आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे पुण्यासह (Pune) राज्यभरात 210 हून अधिक रुग्ण आहेत. यापैकी अनेकजण बरे होऊन घरी परतले असले तरी GBS मुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 9 वर पोहोचली आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याचा प्रसार वेगाने होत आहे.
अशातच आता हा आजार गर्दीने आणि संसर्गाने होत असल्याची शंका आल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरात लवकर राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असं मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलं आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
यावेळी केंद्रीय आरोग्य विभाग आणि यंत्रणा GBS चा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे आता जीबीएसच्या वाढत्या रूग्णसंख्येचा परिणाम राज्यातील यात्रांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना महामारीच्या काळात देशातभरातील यात्रा आणि गर्दी जमा होईल अशा उत्सवांवर निर्बंध होते. असेच निर्बंध जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लावण्याची शक्यता राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता खरंच यात्रांवर निर्बंध येणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.