Gopichand Padalkar
Gopichand Padalkar  Sarkarnama
महाराष्ट्र

आंदोलनात जेवढं मिळतं तेवढं घ्यायचं आणि... ; पडळकरांचा सूर बदलला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अगदी सुरुवातीपासून एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका घेतलेल्या भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आता आझाद मैदानातील आंदोलनातून आपण तुर्तास बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या रिव्हर्स गेअरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण आंदोलन का स्थगित करत आहोत किंवा का माघार घेत आहोत याबाबात सविस्तर स्पष्टीकरण दिले.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी अभिनंदन करतो. कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत पहिल्यांदा संघटना बाजूला ठेवून आंदोलन केले. या दरम्यान सरकार दोन पावले पुढे आले आहे. आपण सगळ्यांनी मिळून सरकारला हेकेखोर पणा बाजूला ठेवून निर्णय घ्यायला लावला. पण समितीचा विलीनीकरणाबाबतचा अहवाल २० डिसेंबरला येणार आहे, २० डिसेंबरलाही निर्णय होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूंचा विचार केला. आंदोलनात जेवढे मिळते ते पदरात पाडून घ्यायचे आणि राहिल्यासाठी भांडायचे असते. असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाची भूमिका आमची आजही आहे, पण आता मार्ग काढला पाहिजे. न्यायालयात विलीनीकरणचा मुद्दा प्रलंबित आहे. म्हणून सारासार विचार केला. आता कोणाला संप करायचा असेल तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण? आझाद मैदानावर आम्ही सांगितले आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. आम्ही आता जाणार नाही. आम्ही नांगे फकीर आहोत, राजकारणात हे होत राहते असे म्हणत पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतली.

सदाभाऊ खोत म्हणाले, विलीनीकरणाची लढाई न्यायालयात आहे, पण तोपर्यंत काहीसा दिलासा म्हणून सरकारने दिलेली पगारवाढ म्हणजे कामगारांचा पहिल्या टप्प्यातील विजय आहे. मूळ वेतनामध्ये वाढ झाली आहे, मागच्या अनेक दिवसांपासून ही वाढ झाली नव्हती. तसेच महामंडाळाला पगारासाठी कमी पडणारा निधी राज्य शासन देईल आणि १० तारखेच्या आत पगार देण्यास सरकार बांधिल राहिल अशी भूमिका घेतली आहे. सोबतच सरकारने निलंबन, बडतर्फ कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचाही निर्णय घेतला आहे. गैरहजर असलेल्या दिवसांच्या पगार देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे असेही ते म्हणाले.

सदाभाऊ खोत यांनी आता न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर विलीणीकरणाचा लढा सुरुच राहिल अशी भूमिका मांडत, कामगार जेव्हा केव्हा हाक मारतील तेव्हा उभे राहू असे अश्वासन दिले आणि तुर्तास आपण आझाद मैदान सोडत असल्याचे घोषित केले. तसेच यापुढे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही, बाकी राज्यभरातले आंदोलन मागे घ्यायचे की तसेच ठेवायचे, याचा निर्णय कामगारांनी घ्यायाचा आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT