Mumbai News, 14 May : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. त्यावरून विविध मतप्रवाह आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. त्यावरून निर्माण झालेला तणाव आणि युद्ध सदृश्य परिस्थिती यासंदर्भात केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विविध प्रश्न केले आहेत. त्यावरून भाजप समर्थक शिवसेनेवर टीका करीत आहेत.
या संदर्भात शिवसेना नेते खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाकिस्तान युद्धा दरम्यान कच खाल्ली. अन्यथा भारतीय सैन्याने आपल्या धैर्य आणि पराक्रमाच्या जोरावर मोठे यश प्राप्त केले असते, असं राऊत यांनी म्हटलं.
तसंच याविषयी भारतीय नागरिक आणि देशावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती देखील नाराज आहे. भारतीय सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर पाक व्यक्त काश्मीर त्यांनी ताब्यात घेतले असते. लाहोर आणि इस्लामाबाद हे देखील भारतीय सैन्याला काबीज करणे कठीण नव्हते.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच खाल्ली. त्यामुळे हे होऊ शकले नाही, असं म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला. तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सैनिकी कारवाईला देशातील प्रत्येक विरोधी पक्षाने आणि नेत्यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला होता.
आता यावरून भाजप वेगळे राजकारण करू पाहत आहे. मग माध्यमांवरून विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजप देशभर तिरंगा यात्रा काढत आहे. यासंदर्भात खासदार राऊत म्हणाले, भाजपला तिरंगा यात्रा काढण्याचा कोणताही अधिकार नाही.
त्यांनी तिरंगा यात्रा काढण्याऐवजी गावोगावी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यात्रा भरवाव्यात. ट्रम्प यांच्या नावाचा उदो उदो करावा. कारण या युद्धात भारताआधी ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केला होता. केंद्र सरकारचे पितळ उघडे पडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.