<div class="paragraphs"><p>Ajit Pawar-Narayan Rane-Deepak Kesarkar</p></div>

Ajit Pawar-Narayan Rane-Deepak Kesarkar

 

Sarkarnama

कोकण

कोण अजित पवार म्हणणाऱ्या राणेंनी उपचार करून घ्यावेत

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली दहशत मोडून काढत लोकांच्या मनातील भीती दूर करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळे राणे मला ओळखत नसतील तरी चालेल पण अजित पवार (Ajit Pawar) कोण असे ते म्हणत असतील तर त्यांनी उपचार करुन घ्यावेत ,असा टोला आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला. (MLA Deepak Kesarkar criticizes Union Minister Narayan Rane)

राणेंनी आता शांततेचे राजकारण करावे. मिळालेल्या केंद्रीय मंत्रिपदाचे सहा महिने असेच गेले. मी तरी चांदा ते बांदा योजना आणली. तुम्ही काय आणलं असा सवाल उपस्थित करत मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग करा. आयुष्य हे क्षणभंगुर आहे, असा सल्लाही केसरकर यांनी राणेंना दिला. आमदार केसरकर यांनी आज (ता. २९ डिसेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, अनारोजीन लोबो, सुशांत नाईक उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा बँक टिकली पाहिजे. ही बँक महाविकास पॅनेलच्या ताब्यात आल्यास शिवराम भाऊ जाधव यांना श्रद्धांजली ठरणार आहे. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करत असलेल्या प्रचार आणि काम पाहता सर्वच्या सर्व जागावर विजय होईल. मात्र, ज्या पद्धतीने नारायण राणे यांच्याकडून जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली, ती चुकीची आहे. त्यांनी आता शांततेचे राजकारण करावे. ज्या वेळी आपल्याकडे मंत्रीपद होते, त्यावेळी सतीश सावंत यांच्याासारखा कार्यक्षम व्यक्ती आपल्या सोबत नव्हता. चांदा ते बांदा योजनेतून सिंधुदुर्गचा शेतकऱ्यांचा विकास केला असता. मात्र, आता सिंधुरत्न ही योजना लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँक ताब्यात यायला हवी. ती ताब्यात आल्यास सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरोघरी विकासात्मक योजना पोचवल्या जातील.’’

‘‘नारायण राणे यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्यांना व्यक्ती आठवत नाही. मात्र, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची असलेली राजकीय दहशत आणि दादागिरी मोडून काढत येथील जनतेच्या मनातील भीती दूर केली आहे. म्हणूनच आज मोकळेपणाने जनता वावरत आहे. त्यामुळे एक वेळ मला नाही ओळखलं तरी चालेल. पण, कोण अजित पवार हे जर ते विचारत असतील तर त्यांनी वेळीच आपले उपचार करून घ्यावे. आज केंद्रीय मंत्री पद मिळाले त्याला सहा महिने झाले. परंतु कोकणासाठी एकही योजना ते आणू शकले नाहीत. मला हे पद मिळाले असते, तर आपण कोकणचा कायापालट केला असता. मी राज्यमंत्री असताना चांदा ते बांदा ही योजना आणली. आज तुमच्याकडे केंद्रीय मंत्री पद असताना तुम्ही एकही योजना आणू शकलेले नाहीत. संसदेमध्ये विचारलेला प्रश्न त्यांना समजत नाही. त्यामुळे ज्या मोदींनी तुम्हाला हे मंत्रिपद दिलं, त्या मोदींना मोठं करायचं असेल तर प्रश्न समजण्याइतपत अभ्यास करा,’’ असा सल्लाही त्यांनी या वेळी राणेंना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT