Aditya Thackeray & Ramdas Kadam Latest News
Aditya Thackeray & Ramdas Kadam Latest News Sarkarnama
कोकण

'मी कधीच मला साहेब म्हणा असं म्हटलं नाही'

सरकारनामा ब्यूरो

सावंतवाडी : शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा आज सिंधुदुर्ग जिल्ह्या येथून सुरू झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी कुडाळ येथे आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेसाठी शिवसैनिकांनी भर पावसात देखील प्रचंड गर्दी केली होती. यानंतर सावंतवाडीतील मेळाव्यात ते बोलतांना त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

जे डोंगर बघायला गुवाहाटीला गेले ते कोकणात का आले नाहीत.चोर म्हणून घोषणा देऊन चोरांचा अपमान करू नका. आता ते कपाळावर गद्दार असा शिक्का घेऊन फिरत आहेत. आता इथले महाशय यांचं तर मी नाव घेणार नाही. कारण ते माझ लगेच वय काढतात. मी कधीही कुणाला सांगितलं नाही की मला साहेब म्हणा कारण तसे माझ्यावर संस्कार नाहीत. सत्तेत असतांना आणि आता आमच्यात काय बदल झाला हे लोकांनी सांगाव.आपण कधीच कुणाला मला साहेब म्हणा असे म्हटलं नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले. (Aditya Thackeray & Ramdas Kadam Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आज दुपारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणादरम्यान आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, जे डोंगर बघायला गुवाहाटीला गेले ते कोकणात का आले नाहीत. सुंदर असलेल्या सह्याद्री डोंगररांगा बघायला का आले नाहीत. चोर अशा घोषण देऊ नका जाऊद्या चोरांचा अपमान करू नका. आता ते कपाळावर गद्दार असा शिक्का घेऊन फिरत आहेत. मी या परिसरात अनेक पर्यावरण, मंदिरे आणि आणखी काही गोष्टींसाठी फंड दिला. मात्र, या बेकायदेशीर आणि गद्दार सरकारने यास स्थगिती दिली आहे, अशा शब्दात आदित्य यांनी शिंदे सरकारवर आणि बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे दिपक केसरकरांच नाव न घेता म्हणाले की, आता इथले महाशय यांचं तर मी नाव घेणार नाही कारण ते लगेच माझ वय काढतात. याचबरोबर मी कधीही कुणाला सांगितलं नाही की मला साहेब म्हणा, मला मोठ्यांनी आदित्या म्हणा, लहानांनी आदित्य म्हणा तर कुणी मला एटी म्हणतं मात्र आपण कधीही कुणाला साहेब म्हणा असं म्हटलं नाही. मात्र, पक्षाने मला शिवसैनिक अशी ओळख दिली आहे. मात्र, मला अभिमान आहे की मी कधी माझी ओळख आणि नाव विकलं नाही. याबरोबरच असेही म्हटलं जात की मी आल्यावर उभे रहावे लागते. मात्र मी कधी म्हटलं नाही की मी आल्यावर उभे रहा. उलट कुणी आलं तर मी स्वत: दरवाजा उघडायचो. मी कधी उद्धटसारखा वागलो नाही. कारण तसे माझ्यावर संस्कार झालेले नाहीत. आम्ही सत्तेत असतांना किंवा आता आमच्या वागण्यात काय फरक पडला? असा सवालही उपस्थित केला.

ते म्हणाले की, आम्ही कधीही सत्तेला चिकटलो नाही. या बंडखोरांना पक्षाने किंवा आम्ही काय कमी केलं होत? मात्र त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या आजारी असतांना पाठीत खजींर खुपसला, असा घणाघात आदित्या यांनी केला.

दरम्यान, शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदारांनी अनेकदा 'मातोश्री'वर गेल्यावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भेट देत नाहीत. आमदार, खासदारांच म्हणने ऐकत नाहीत, असे अनेक आरोप केले आहेत. तर शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एका मुलाखतीत आपल्याला आदित्या ठाकरे यांना साहेब म्हणावं लागत, असे म्हटले होते. तर दीपक केसरकरांनीही आदित्य यांनी टीका केल्यावर त्यांच वय काढलं होत. यामुळे कोकणात जाऊन आणि केसरकरांच्या मतदारसंघातच त्यांनी याचा उलगडा केला आहे. शिवाय २०१४ नंतर ते शिवसेनेत आले आणि आता तेच हिंदूत्व आणि शिवसेना आम्हा शिकवत आहेत असा टोमणा देखील केसरकरांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT