Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Vs Congress: मोदींचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना अशोभनीय, त्यांनी औकातीत राहावं; भाजपची घणाघाती टीका

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi On Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना शोभत नाही, त्यांनी औकातीत राहावं, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे.

पराभवाच्या भीतीनं सोलापुरात राहुल गांधींकडून मोदीजींचा एकेरी उल्लेख करण्यात आला, परंतु, शिव्यांना दागिना बनवणं मोदीजींची सवय आहे, त्यामुळे आता जनताच काँग्रेसला धडा शिकवेल, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

सोलापुरातील (Solapur) महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. "नरेंद्र मोदींना भीती वाटायला लागली की ते कधी पाकिस्तान तर कधी चीनची भाषा करतील आणि ते एकामागून एक खोटं बोलतात," अशी टीका राहुल गांधी यांनी केली. या वेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर केला. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून, राहुल यांच्या वक्तव्याचा भाजपकडून (BJP) जोरदार निषेध केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल (Narendra Modi) एकेरी उल्लेख करतात.

देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे.

गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं, पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला. निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत.

पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळणार नाही," अशा शब्दांत बावनकुळेंनी राहुल गांधींवर टीका केली आहे. तसंच राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे राज्यात काँग्रेसचा पराभव होईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT