स्वातंत्र्यदिनानिमित्त आज मांसविक्रीबंदी करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात मांसविक्रीवरील बंदीमुळे तणाव निर्माण झाला आहे. मांसविक्री सुरू ठेवण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
वाशिमचे पालकमंत्री, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत येथे शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात झाला. शहीद सैनिकांच्या पत्नी,पोलिस अधीक्षक, अधिकारी,कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्रशासनात काम करणाऱ्या विविध अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केले. यावेळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश पोलिसांकडून सलामी देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. मागासवर्गीयांना प्राधान्य देऊन आपल्याला बदल घडवायचा आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू करणार आहे. हे सुदर्शन चक्र एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, जी शत्रूचा हल्ला केवळ निष्फळ करणार नाही तर अनेक पटींनी जोरदार प्रत्युत्तरही देईल. आपण पुढील दहा वर्षांत सुदर्शन चक्र मिशनला प्रखरतेने पुढे नेऊ. या अंतर्गत २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या स्थळांना या राष्ट्रीय सुरक्षा कवचाखाली आणले जाईल. या सुरक्षा कवचाचा विस्तार सातत्याने होत राहील. देशातील प्रत्येक नागरिकाने सुरक्षित वाटावे, यासाठी मी २०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. म्हणूनच श्रीकृष्णांकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुदर्शन चक्राचा मार्ग स्वीकारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण खूप वेगाने पुढे जायचे आहे. मी हे देशासाठी करत आहे, माझ्यासाठी करत नाही. कोणाचे वाईट करण्यासाठी करत नाही. "गेल्या दशकभरात भारताने सुधारणा केल्या, कामगिरी केली आणि परिवर्तन घडवून आणले आहे. पण आता आपल्याला आणखी मोठ्या ताकदीने पुढे जायचे आहे. अलीकडच्या काळात आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत त्यामध्ये एफडीआय, विमा क्षेत्रातील सुधारणा, आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना भारतात कार्य करण्यास परवानगी देणे यांचा समावेश आहे..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशातील जनतेला आता स्पष्ट समजले आहे की सिंधु करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतातून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी आपल्या शत्रूंची शेती सिंचन करत आले, तर माझ्या स्वतःच्या देशातील शेतकरी आणि जमिनी तहानलेली, पाण्याविना राहिली. हा असा करार होता ज्यामुळे गेल्या सात दशकांपासून माझ्या देशातील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. आता या पाण्यावरचा हक्क फक्त भारताच्या शेतकऱ्यांचा आहे..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पाकिस्तानला इशारा दिला की अणुबाॅम्बची ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. लष्कर त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. पाणी आणि रक्त वाहू देणार नाही. सिंधू प्रणालीच्या नद्यांवर फक्त भारताचा अधिकार.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. 2014 पासून पंतप्रधान मोदी यांनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.