- मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांविरोधात दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला
- रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचं विधानभवनातील एक व्हिडिओ ट्विट करत कोकाटे रमी खेळत असल्याचा केला होता आरोप
- या प्रकरणी मंत्री कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात रोहित पवारांविरोधात दाखल केलीय मानहानीचा खटला
- या खटल्यासंदर्भात येत्या ३ ऑक्टोबरला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात होणार पुढील सुनावणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक महत्वाची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेनेही पूर, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलले आहे.
विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही, हे पहिले सरकार आहे ज्यांनी पाहणीपूर्वीच 2200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रिलीज केले आहेत.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल ते आम्ही करत आहोत आणि पुढेही करू,” असेही फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार विधानपरिषद सदस्य आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते.
महाराष्ट्रातील बीड आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या पुराची सविस्तर पाहणी केली. त्यांनी 17 सप्टेंबरपासून विविध भागांमध्ये पाहणी करत शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली. मुंडे यांनी सांगितले की, पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, काही ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे तर काही ठिकाणी गाळ साचला आहे. सरकार पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरमधून नुकसानीची पाहणी केली. सोलापूरच्या माढा तालुक्यातील दृश्यांवरून स्पष्ट होते की, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि परिसर पाण्याने वेढलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः हेलीकॉप्टरने संपूर्ण राज्यभरातील पूरग्रस्त क्षेत्रांचा आढावा घेतला. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या पाहणीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २०२१ मध्येच या जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र, विधानसभेची निवडणूक न झाल्याने राज्यसभेची निवडणूकही रखडली होती. आता विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर राज्यसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये मुक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चा सहभागी झालेल्या लोकांनी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतील. त्यांचा दौरा लातूर जिल्ह्यातील काडगाव येथून सुरू होणार आहेत. धारशिवमधील इटकुर, पारगाव, बीडमधील कुर्ला, जालन्यातील महाकाळा आणि छत्रपती संभाजीनगर येथील रजापूर येथे ठाकरे पाहणी करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. पाऊस तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करत आहेत. यावेळी त्यांसोबत माजी मंत्री तानाजी सावंत हेही आहेत. पाहणीसाठी आलेल्या शिंदेंना स्थानिक शेतकऱ्यांनी घेराव घातल्याची माहिती आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे मान्यवर नेते नुकसानग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. जयंतराव पाटील हे सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात जाणार आहेत, तर, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बीडमध्ये जाणार आहे. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावर देखील वेगवेगळ्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माढा तालुक्यातील मुंगशी गावाला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत थेट शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतपिकांचं व घरांचं झालेलं नुकसान तसंच नागरिकांच्या इतर अडचणींबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. पंचनामे जलद गतीनं पूर्ण करून नुकसानभरपाई त्वरित मिळेल, याकडे आम्ही पूर्ण लक्ष देऊन आहोत, असा विश्वास त्यांनी दिला.
लक्ष्मण हाके यांचे समर्थक पवन करवर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे तीन साथीदार किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला हे समजू शकले नाही.
पावसामुळे मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे.
मुंबईत मेट्रो-७ रेड लाईन दोन तासांपासून खोळंबली. ओवरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक समस्या निर्माण झाली. सकाळी ८ वाजल्यापासून मेट्रो वेळेत नाही, त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो आहे. मेट्रो बंद असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. प्रवाशांनी खबरदारी घेण्याचे आवाहन.
26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान मराठवाडा, विदर्भ, कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी पूरस्थिती संभवते. पुण्यात 28- 29 सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता आहे.
वालवड गावात दुधना नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन पिके व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची जनावरे व मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी व तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकर-यांचं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या व मतदान केंद्रांची यादी 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. दिवाळीनंतर याद्या अंतिम होणार असून निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे राऊत म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी सात वाजताच सोलापुरात पोहचले, ते धाराशीव येथे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही धाराशीवच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर आणि लातुरच्या दौऱ्यावर आहेत.
सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोलापूर - कोल्हापूर महामार्गवरील तिऱ्हे पूल गेला पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सोलापूर - कोल्हापूर वाहतूक झाली ठप्प आहे. तिऱ्हे परिसरातील पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे विश्वासू समजेल जाणारे पवन कंवर यांच्या सावरगावजवळ हल्ला करण्यात आला. कंवर यांच्यासह त्यांच्यासोबत असेलल्या तीन जणांवर देखील हल्ला गेला गेला. बीडमधील सावरगावजवळ जेवण करत असतानाच 40 ते 50 अज्ञातांनी पवन कंवर यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.
अजित पवारांनी सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून सुरू केला. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले.
शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3.00 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्री 11 पासून थांबण्यात आली आहे. सीन नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामार्ग बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.