गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी दिली आहे. शिवसेनेत मी संपर्कप्रमुख असताना माझ्या तालुक्यातील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख परस्पर निवडले गेले. शिवसेनेत संपर्कप्रमुख पद हे जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वात मोठे पद आहे. मात्र मला न विचारता निवडी होत असतील तर तिथे राहणे योग्य नाही असे मला वाटले. शिवसेनेत एक शिस्त होती मात्र अलीकडच्या काळात ती विस्कळीत झाली आहे असं ते म्हणाले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडितांमधील वाद टोकाला गेला आहे. हाकेंच्या टिकेनंतर आमदार विजयसिंह पंडितांनी जोरदार प्रत्युत्त दिलं आहे. लक्ष्मण हाके म्हणजे भटका कुत्रा आहे. 'माझ्याबाबत बोलण्याची त्याची औकात नाही'. असं म्हणत विजयसिंह पंडितांनी हाकेंवर पलटवार केला आहे.
नागपूर येथे संविधान चौकात कंत्राटदारांनी भीक मांगो आंदोलन सुरु केलं आहे. शासनाने काम करुन पैसे न दिल्याने विदर्भातील कंत्राटदार यांनी एकत्र येत केले आंदोलन पुकारलं. कंत्राटदारांनी काळ्या रंगाचा टीशर्ट घालून स्त्याच्या कडेला उभे राहत भीक मागत निषेध नोंदवला.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आहे. बीड जिल्ह्यात मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्नावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्या कडून जमावबंदीचे आदेश दिले आहे.
विवाहित मुलीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची आणि मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. लग्नानंतरही विवाहिता आणि प्रियकराचं भेटणं सुरु होतं. सोमवारी हा मुलगा विवाहितेला भेटायला आला होता.
सरकारने आम्हाला एक रस्ता द्यावा, त्या रस्ताने आम्ही आझाद मैदानावर जाणार, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी यांच्यासोबत माध्यमांसमोर चर्चा करणार असे जरांगे यांनी सांगितले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी कोकणवाशीयांची स्वारगेट बस स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. कोकणाकडे जाणाऱ्या एसटीबस मध्ये मोठी गर्दी होत आहे. मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील जास्त असल्याचे या बसमध्येही गर्दी होत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठा आंदोलक ॲक्शन मोडवर आले आहेत.मुंबईत बाहेरून येणाऱ्या आंदोलकांच्या वाहनांच्या पार्किंगसंदर्भात जागेची पाहणी करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या मुंबईतील शिष्टमंडळाने पोलिस अधिकाऱ्यांसह समन्वयाने पाहणी केली.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील दोन सातारा-कोल्हापूर आणि कराड-चिपळूण रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंपन्यांना इशारा दिला आहे. या दोन्ही महामार्गांची कामे संथ गतीने सुरु असून या कामाविषयीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 दिवसाला बारचार्ट सादर करावा. अन्यथा दिलेल्या अवधित काम पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र शासनाचा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
भाजपने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची सोमवारी रात्री अचानक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली आहे. तर आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा राडा झाला होता. यामध्ये लक्ष्मण हाकेंच्या अंगावर विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी चपला फिरकवल्या होत्या तर हाकेंच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी सुमोटो नुसार 14 आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचाही सहभाग आहे.
मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला EWS अंतर्गत 10 % आरक्षण असताना पुन्हा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी गेले अनेक वर्षे मराठ्यांना न्यायालयात आरक्षण टिकवता आले नाही. तरीही पुन्हा राजकारणसाठी मनोज जरांगे-पाटील पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. तरी सरकारने जरांगे विरोधातील एसआयटी आहवाल सादर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकावे अशी मागणी ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, नितीन बोराटे यांनी केली आहे.
रिलायन्स फाऊंडेशनच्या वनतारा प्रकल्पाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा आणि देशविदेशातून वन्यप्राणी ताब्यात घेण्याच्या प्रकल्पाच्या विद्यमान प्रक्रियेबाबतची चौकशी केली जाणार आहे. न्या. जया सुकीन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायलयाने हे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.