पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात मानाचा पहिला गणपती कसबा १०.१५ वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ झाला. पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ. दरवर्षी पेक्षा यंदा एक तास अधिच मिरवणुकीला सुरुवात
मुळशी धरण ९८ % भरले आहे व पाऊस कमी / अधिक प्रमाणात होत आहे आणि पाणी पातळीत वाढ घट होत आहे. त्यामुळे मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 1300 ने सुरू असणारा विसर्ग सकाळी ११:०० वाजता 2946 Cusecs करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर आला होता. 14 पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत पोहोचले असून, 34 गाड्यांमध्ये 400 किलो RDX लपवण्यात आलं आहे, असा धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याला पोलिसांनी नोएडामधून अटक केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मुरूमाच्या बेकायदेशीर उत्खननावरून अजित पवार यांच्या आघाडीतील भागीदारांनी जाणूनबुजून त्यांच्या आणि आयपीएस अधिकाऱ्यातील संभाषणाला वेगळा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चौफेर टीका होत असताना रोहित पवारांनी केलं समर्थन केलं आहे. रोहित पवार म्हणाले, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू.
मुंबईत 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आणि जवळपास पावणेदोन लाख घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आल्याचं सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं. तसंच या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी एआयच्या मदतीने सर्व घडामोडी टिपण्यासाठी लालबाग तसेच महत्त्वाच्या मंडळाच्या ट्रक, तसेच वाहनांना चीप बसवली आहे. यामुळे गर्दीत हे वाहन जिथे जाईल त्याची स्थिती पोलिसांना कळेल आणि तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल. सीसीटीव्हीद्वारे संशयास्पद हालचाली, व्यक्तींबाबतही पोलिसांना अलर्ट मिळेल.
भिवंडी शहरातील नारपोली परिसरात बालाजी डाईंग या दोन मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली आहे. डाईंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांचा साठा असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आज सकाळी 10 पासून ते मिरवणूक संपेपर्यंत गणेश रस्ता, दारूवाला पूल ते जिजामाता चौक, केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक बंद असणार आहे.
हे रस्ते दुपारी 12 पासून बंद राहणार
6 सप्टेंबर शनिवारी दुपारी 12 पासून ते 7 सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत
बाजीराव रस्ता : सावरकर रस्ता ते फुटका बुरूज चौक, कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते विश्रामबाग चौक, शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक हे रस्ते बंद राहणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.