Congress Party Transformation Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : लातूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी नगराध्यक्षासह तीन नगरसेवक भाजपात

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Roshan More

लातूरमध्ये काँग्रेसला धक्का, माजी नगराध्यक्षासह तीन नगरसेवक भाजपात

लातूरमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. चाकूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि 3 विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश करणाप आहेत. तसेच चाकूर पंचायत समितीचे ५ पंचायत समिती सदस्य देखील काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार आहेत.

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच - डॉ.पंकज भोयर

‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली. पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्यासंदर्भात सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता, त्यास राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी उत्तर दिले. यात सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला.

खासदार निलेश लंके उपोषण करणार

खासदार निलेश लंके आजपासून (शुक्रवार) अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामाचे टेंडर होऊन देखील काम सुरू न झाल्याने त्यांनी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

निकेत कौशिक यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला

मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर मिरा भाईंदर वसई विरारचे पोलिस आयुक्त म्हणून निकेत कौशिक यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त संदिप डोईफोडे,अशोक विरकर, प्रकाश गायकवाड व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस दल, या भागातील नागरिक आणि रहिवाशांचे जीवन, स्वातंत्र्य आणि कायदेशीर हितसंबंधांचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्यानुसार चांगल्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारी घटकांना आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी स्थापित नियम आणि कायदे काटेकोरपणे पालन करावे. सामूहिक प्रयत्नांद्वारे मीरा-भाईंदर, वसई-विरारमध्ये शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखू आणि ते एक आनंदी आणि समृद्ध समुदाय बनवू याची आम्हाला खात्री आहे अशी प्रतिक्रिया कौशिक यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, चार जणांना मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. कंटेनरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर चारचाकीवर पलटी झाल्याने चार जणांना जागेची मृत्यू झाला. कंटेनर खाली गाडी दबल्याने दोन महिला आणि दोन पुरुष प्रवाशांचा मृत्यू झाला.अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व मुबंईच्या अंधेरीमधील होते. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT