श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परिस्थितीची माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी श्रीरामपूरमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.
भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीबरोबरचे आक्षेपार्ह फोटो काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या प्रकरणी जळगाव शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयित फेसबुक खातेधारकाला पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. संबंधिताचा मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. भरत म्हस्के असे संशयिताचे नाव असून त्याला इंदापूर (जि. पुणे) येथून ताब्यात घेतले आहे.
बदलापूर येथील एका प्रकरणात अटकेत असलेला अक्षय कुरतडकर हा तरुण सध्या आधारवाडी कारागृहात बंद आहे. त्याला जेलमधील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाला १६ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे.
ओबीसींच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके लवकरच ओबीसी जनता पार्टी काढणार आहेत. बारामती मधील पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. ओबीसी जनता पार्टी असेल जी महाराष्ट्रात पुढे येईल ओबीसींच्या प्रश्नांवर काम करील असं लक्ष्मण हाके यांनी म्हटल आहे.
उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा हे बेगडी प्रेम आहे. पक्षाची रक्षा करण्यासाठी ते आता रामरक्षा म्हणत आहेत असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. राम भक्ताला चोर हरामखोर म्हणाले ते आता रामरक्षा म्हणू लागले आहेत. आता ते पक्षाची रक्षा करण्यासाठीच रामरक्षा म्हणत आहेत. रमेश म्हात्रे यांच्यासारख्या मारहाणीचे प्रकार मी सहन करणार नाही. डॉक्टरांवर झालेले हल्ले सहन करणार नाहीत याबाबत श्रीकांत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना निमंत्रण दिल्यामुळे संतापलेल्या काँग्रेस, डीएमके, टीएमसी, समाजवादी पक्ष, दहाहून अधिक विरोधी पक्षांनी अवघ्या १५ मिनिटांमध्येच सभात्याग करून बैठकीतून उठून जाणे पसंत केले. तृणमूलच्या फुटीर २० खासदारांच्या अपात्रेतचा निर्णय प्रलंबित असताना एनसीपीआयला बैठकीचे निमंत्रण दिल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आणि संतापलेल्या तृणमूलस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.
ओबीसी जनता पार्टी नावाचा नवा पक्ष काढण्याची घोषणा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिलेला नाही, त्यामुळे कोणाची तरी हुजरेगिरी, गुलामगिरी करण्यापेक्षा ओबीसी बांधव आपल्या प्रश्नावर काम करायला सुरुवात करतील, तेव्हा महाराष्ट्रात ओबीसींची सत्ता असेल, असा दावाही हाके यांनी केला.
सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची कन्या नगरसेविका राजूल पाटील ह्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचूक, अभिजीत दीपके यांना पाठिंबा दिला. मात्र वडिलांच्या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले.
इतकी वर्षे आपण कोणाचा जप करत होते, आमच्या मोदीसाहेबांचा. मागची भाषणं त्यांनी काढून पाहावीत. तुमचं काम आता चालू द्या. तुम्ही आणि तुमचा पक्ष तिथंच राहा. तुमचा पक्ष कसा वाचेल, हेच त्यांनी पाहावे. आमच्यापुढे झुका असं आम्ही काय कोणाला म्हणत नाही. लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
डॉक्टरांना मारहाण करणारा शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याचा कल्याण न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने त्याला रविवारी सायंकाळी पाचपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार म्हात्रे हा आज चार वाजताच पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पाच दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात रविवारी उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. आता ही आग सरकार बदलेपर्यंत सुरूच राहणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करायला आलो नाही तर तुमच्यासोबत लढ्याला आलो आहे. केंद्रातील सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगत राहिली पाहिजे, असा इशारा देत येत्या काळात हा लढा व्यापक करण्याची घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली.
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात रविवारी उद्धव ठाकरे यांचा पक्ष रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासोबतच स्टेजवरूनही पोलीस व शिवसैनिकाच्या वाद झाला. याठिकाणी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.
आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा सरसावलाय. सोलापुरात विसावलेल्या गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी 'श्री संत नाभिक दुकानदार संघा'नं मोफत दाढी-कटिंगचा उपक्रम राबवलाय. 100 सेवेकऱ्यांसह एका महिला भगिनीनेही वारकऱ्यांची मोफत दाढी-कटिंग केलीये.
बीड जिल्ह्यातील परळीत जुन्या भांडणाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणावर जीवघेण्या हल्ला झाला आहे. चांदापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका हॉटेलवर चहा पीत असताना अभिजीत नागेश कांबळे या तरुणाला गाठले नंतर त्याला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात,पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील कथित हल्ल्याप्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय... न्यायालयानं म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जामीन रद्द केलाय... त्यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विष्णुनगर पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिलेत...
नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून तब्बल 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडेला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी व्यावसायिकाला तसेच त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे.
गिरड व्याघ्र प्रकल्पातील 'गिरडच्या राणी' वाघीणीच्या दोन वर्षांच्या मादी बछडीला वनविभागाला पकडण्यात आली आहे. पिंपळगाव, उंदिरगाव, साखरा, जोगिंगुफा परिसरात वाघीणीने दहशत निर्माण केली होती. वाघिणीच्या हल्ल्यात अनेक जनावरे ठार, तर काही जखमी झाल्याची नोंद. वाढती दहशत लक्षात घेऊन वाघिणीला पकडण्याची तातडीने परवानगी.
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. प्रवाशांची गर्दीतून सुटका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 15 डब्यांच्या नवीन लोकल सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे मुंबईतील रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य मुंबईकरांकडून स्वागत केले जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. दुधलगाव परिसरात एका शेतात कामाला असलेले मध्य प्रदेशातील पती-पत्नी हे रात्रीच्या वेळेस झोपलेले असताना अचानक दोन इसम हातात शस्त्र आले. त्यांनी दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवला. 19 वर्षीय या विवाहितेवर आळीपाळीने आणि बळजबरी ने बलात्कार केला. शिवाय त्यांच्याकडे असलेले मोबाईल व काही रोख रक्कम घेऊन दोघे दुचाकीने पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी 19 वर्षे विवाहित पीडीतेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली आहेत.
जळगाव शहरातील वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने 3 ते 17 जुलै या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या 15 दिवसांच्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 1 हजार 597 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 16 लाख 54 हजार 250 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निवाना गावातील शेतकऱ्याने गावातीलच कृषी केंद्रावरून सोयाबीनचे बियाणे खरेदी केलं व आपल्या सात एकर शेतात पेरले. मात्र यातील फक्त 20 टक्के सोयाबीन उगवल्याने संतप्त शेतकऱ्याने आपल्या सात एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवून हे पीक नष्ट केलं आहे. बोगस व न उगवलेल्या बियाण्याची तक्रार देण्यासाठी गेले असता संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी पद हे गेल्या सहा महिन्यापासून रिक्त असल्याने आता तक्रार करावी तरी कुणाकडे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
काळ बनून आलेल्या दरडीने 84 आदिवासींना गिळले, निसर्गाने छप्पर हिरावले शासनाने बांधून दिलेली घरे 2 वर्षांत गळू लागली आहे. 19 जुलैला इर्शालवाडी दुर्घटनेला 3 वर्ष पूर्ण होत असून आपले बेपत्ता नातेवाईक पुन्हा कधी येतील या भाबड्या आशेवर इर्शालगडाकडे डोळे लावून बसले आहेत. नानीवलीत आपत्तीग्रस्तांसाठी 44 घरे बांधली. 3 वर्षात बांधलेली पक्की घरे गळू लागल्याने गळती काढण्यासाठी शासनाची दारे ठोठावण्याची पाळी आली आहे.
महागाईने होरपळलेल्या महाराष्ट्रातील जनतेवर महायुती सरकारने पुन्हा एकदा एसटी भाडेवाढीचा बोजा लादला आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "एसटीची १३.५६ टक्के भाडेवाढ म्हणजे महायुती सरकारचा सर्वसामान्यांच्या खिशावर मारलेला आणखी एक डल्ला आहे," अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी आपला संताप व्यक्त केला.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते, लेखक आणि तरुण पिढीचे मार्गदर्शक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे सच्चा गांधीवादी व समाजवादी 'सप्तर्षी' निखळला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आ
जय पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीमुळे आता पुण्याची राष्ट्रवादीची सूत्रे जय पवार यांच्या हातात जाणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक प्रश्नांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रभागातील विकासकामांची सद्यस्थिती आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्या कशा पूर्ण करता येतील, याची चाचपणी करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक वाढीबाबत जय पवार यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि पुढील कामांचे नियोजन आखण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषदेत बिल मंजुरीच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भाजपचे नगराध्यक्षासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मागील वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर घाटमाथ्यसह मराठवाडा विदर्भातही पावसाला अनुकुल परिस्थिती तयार झाल्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुणे, अहिल्यानगर यासह बीड, परभणी,हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
अभिजीत दिपके यांच्या आई-वडीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. "लोकशाहीमध्ये ही भारतीय लोकांची चूक आहे, की त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिलंय की ज्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही, मूल नाही, कुटुंबात कोणत्या गोष्टी लागतात, याचं या व्यक्तीला काहीही देणंघेणं नाही, अशा माणसाला जनतेनं पंतप्रधानपदी बसवलं आहे. त्याचे परिणाम आता सगळा देश भोगत आहे, अशी भाषा अभिजीत दिपके याचे वडील भगवानराव दिपके टीका करताना वापरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.