चंद्रपूरमधील दिग्गज नेते अविनाश आणि सतीश वारजूरकर यांनी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे. यामुळे येथे राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान वारजूरकर बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत असून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सरडपार गावात आंतरजातीय विवाह केलेल्या एका दाम्पत्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सचिन सोनटक्के आणि सुजाता सोनटक्के या दाम्पत्याने गावकऱ्यांवर सामाजिक तसेच आर्थिक बहिष्कार टाकल्याचा आरोप केला आहे. सचिन हे अनुसूचित जातीतील तर सुजाता या अनुसूचित जमातीतील असून, मे २०२३ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर कुटुंबात वाद निर्माण झाल्याने सचिन यांच्या आई आणि भावाने गाव सोडून सिंदेवाही येथे वास्तव्यास गेल्याचे दाम्पत्याचे म्हणणे आहे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणीला जोर धरत असून या प्रकरणी बारामती पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेवून ते गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत. यादरम्यान कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महान क्रांतिकारी वीर सावरकर जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. त्यांनी देशाला गुलामगिरीच्या साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत राहील."
हिंगोली मध्ये भाजपने शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे हिंगोलीचे नेते व माजी मंत्री जय प्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबईमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला दीड हजार हून कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केलेला आहे साडेचारशे ते पाचशे गाड्यांचा ताफा नवी मुंबई शहरामध्ये आतिश दांडेगावकरांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन दाखवत भाजपात पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये भाजपची राजकीय ताकद वाढली आहे.
पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पासाठी घेतलेल्या मात्र न वापरलेली जमीन परत मिळावी यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आग्रही झाले आहेत. शेतजमिनीचा कोरा सातबारा मिळावा यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी 27 फेब्रुवारीपासून पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. गेली 17 वर्षे या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्यांमधील 3 हजार 800 कुटुंबं बाधित झाली आहेत.
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलीस स्टेशनला जाणार आहेत. पोलीस स्टेशनबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केलीय. दरम्यान याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरींनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी FIR नोंदवून घेण्यास नकार दिला होता, यावरुन पोलीस आणि रोहित पवारांमध्ये वाद झाला होता.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येमागे तीन प्रमुख कारणे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात युक्तिवादादरम्यान केला आहे. या प्रकरणात २१ आरोपींविरोधात पुणे गुन्हे शाखेने १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, ३९ साक्षीदार तपासले गेले आहेत. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीत पूर्ण होणार आहे.
पुणे वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार वाहनांवरील दंड ३० दिवसांच्या आत जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ठराव संकलन प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू होणार असून, तालुकानिहाय संस्थांची यादी २ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इस्रायल दौऱ्यावर आहेत.मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित करत विविध महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारत आता आणि भविष्यातही इस्रायलबरोबर खंबीरपणे उभा असल्याचं वक्तव्य केलं.
माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या ४५३ बसचे रूपांतर निमआराम आणि साध्या वाहनांमध्ये करण्यात येणार आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची एसआयटी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.