धाराशिवमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेल तुटवडा झाला आहे. या मुळे पेट्रोल डिझेल पंप बंद आहेत. तर जिथं इंधन उपलब्ध आहे, त्या पंपावर नागरिकांची मोठी गर्दी आहे. डिझेल नसल्याने शेतकऱ्यांनी पंपावरच ट्रॅक्टर लावले आहे. इंधन तुटवड्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून, तर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.
नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विविध विषयांवरून दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली. सभेत एकूण 16 विषय मांडण्यात आले होते. मात्र, विरोधकांकडून सर्वच विषयांना विरोध करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा करत पेढे वाटले, यांच्यासाठी इलेक्शनपासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शनने समाप्त होतो. पुण्यातील नसरापूर दुर्घटनेची जाण ठेऊन जल्लोष साजरा केला नसता, तर तुम्हाला माणुसकीची जाण आहे, असं वाटलं असतं. मुख्यमंत्र्यांना गृह खात सांभाळता येत नसेल, तर दुसऱ्या कोणाला तरी द्यावं खाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यात माणुसकी राहिली नसल्याने, त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, असा घणाघात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावणारी टोळी सक्रिय झाली असून, या अगोदर ही ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने केली आहे. मात्र असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला आहे. एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. एकाच मुलीचे अगोदर आठ जणांबरोबर लग्न लावण्यात आले. मात्र पैशासाठी पुन्हा उमापूर इथल्या नवव्या नवरदेवासोबत एजंट लग्न लावून दिले आणि लाखो रुपयांची फसवणूक केली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी इथं अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जनगणना 2027च्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अर्ज फेक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अर्ज बनावट आणि अनधिकृत असून, बँक डिटेल्स जनगणनेत कुठेच भरले जात नाही. त्यामुळे हा फॉर्म फेक आहे. नागरिकांनी सावध राहावे, असे वाशिमच्या जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे.
नसरापूरमधील पीडितेच्या उत्तरीय तपासणीचा अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबला होता. छातीवर मारहाणीचे वळ उमटले होते. यानंतर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला, असे अहवालात म्हटलं आहे.
आपल्या झाडाचे आंबे तोडले म्हणून एका दाम्पत्याने 15 वर्षीय मुलाला अमानुषपणे बेदम मारहाण केली. ही घटना बदलापूरमध्ये घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील तुळशीराम बंगल्याजवळ सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. खाऊ आणायला जाते असे सांगून गेलेली आई आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच सोडून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या तीन मुलांमध्ये एक मुलगा आणि दोन मुली असून त्यांचे वय साधारणतः 4 ते 5 वर्षांच्या दरम्यान आहे. एका स्थानिक महिलेने शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री यादव यांना याबाबत माहिती दिली.
पाच राज्याचा निकाल नुकताच लागला आहे. यात काँग्रेसच्या अपयशावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ९९ पराभवांचा टप्पा पार करून “शतकाच्या उंबरठ्यावर” पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे खास अभिनंदन! आता फक्त एका पराभवाची गरज!… आणि, इतिहास रचला जाईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.