Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

Marathi Breaking Live Headlines Updates : नाशिकला भूकंपाचे धक्के बसले असून 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यासह आजच्या दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

“नियत आणि दानत मोठी होती”; हसन मुश्रीफांकडून डी.वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा

डी.वाय.दादा आणि माझ्या वयात फार मोठं अंतर होतं. तरीसुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना फार वेळा त्यांचे माझे संबंध आले. आमचे सहकारातील गुरु शामराव भिवाजी पाटील आणि डी.वाय.दादांची फार मोठी मैत्री होती. आमदार असतात त्यांनी केलेलं काम आणि राजाराम सहकारी कारखाना कारखाना होण्यासाठी त्यांनी दिलेला लढा. एखाद्या राकट पाटील कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे डी.वाय.पाटील होते, अशा शब्दात हसन मुश्रीफांनी डी.वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला.

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भाजप नेत्यामुळे शिर्डीकडे वळवला; काँग्रेसचे माजी मंत्री 4 खासदारांसह मैदानात

नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर चाकणमार्गे व्हावी ही मागणी आहे. त्यात राजकारण आडवे आल्याने हा मार्ग बदलण्याचे प्रयत्न आहेत. त्याला आज लोकप्रतिनिधी थेट आव्हान देणार आहेत. नाशिक पुणे रेल्वे मार्ग प्रक्रिया सुरू असताना अचानक तो शिर्डी मार्गे वळविण्यात आला. त्या विरोधात या भागातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हा संताप आज रस्त्यावर उतरणार आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाच ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. संगमनेर (हिवरगाव) येथे थोरात आणि खासदार निलेश लंके नाशिक पुणे रेल्वे रास्ता रोको करतील. समृद्धी महामार्गावर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको होईल.

“फडणवीसांचे बूट चाटून जीभ खराब झाली”, राज ठाकरेंवरील टीकेला मनसेचा पलटवार

नवी मुंबईत भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसेकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. नवनाथ बन यांनी राज ठाकरे हे मुलगा अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी तरुणांची गरज असल्याने त्यांच्यासोबत आंदोलन करत असल्याची टीका केली होती. यावर मनसे प्रवक्ते आणि पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले यांनी नवनाथ बन यांच्यावर जहरी टीका केली. “फडणवीसांचे बूट चाटून नवनाथ बन यांची जीभ खराब झाली असून, ती अधिक खराब होऊन गळून पडेल,” असा घणाघात योगेश चिले यांनी केला.

डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे जेलमधून बाहेर

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अखेर आधारवाडी कारागृहातून सुटका झाली आहे. हायकोर्टाच्या अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी असल्याने रमेश म्हात्रे थेट गोव्याला रवाना झाले आहेत.

पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा -  सदानंद दाते

पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा, असं मत राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जबाबदारीचे असून हे पदक ते बाळगताना परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. नव्याने खात्यात येणाऱ्यांसाठी हे पदक आदर्श ठरणारे आहे. आपल्या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास केला गेला पाहिजे. यासाठी व्यवस्थात्मक रचना निर्माण करावी लागेल, असं दाते यांनी म्हटलं आहे. राज्यातील सन २०२३ व २०२४ मधील उत्कृष्ट अन्वेषणासाठी निवड झालेल्या एकूण २२ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना भारत सरकार, केंद्रीय गृहमंत्रालय पुरस्कृत ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान करण्याचा पुरस्कार वितरण समारंभ पोलिस संशोधन केंद्रात पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

११ ऑगस्ट पासून दूध दरात दोन रुपयांची वाढ

पुण्यात ११ ऑगस्ट पासून दूध दरात दोन रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार आहेत. गायी आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ होणार आहे. डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते आष्ट्यासह कागलमधील विविध विकासकामाचं उद्धाटन करणार आहेत.

नाशिकला भूकंपाचे धक्का, 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. रात्री झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले. प्रशासनाने नागरिकांनी संयम ठेवण्याच्या आणि रात्री सुरक्षित ठिकाणी झोपण्याचं आवाहन केलं होतं. तसंच अफवा पसरवू नये असंही आवाहन रात्री प्रशासनाने नाशिककरांना केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT