इंडिया स्किल्स 2025-26 या स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी दमदार कामगिरी करत 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 17 पदकं पटकावली आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला वर्ल्ड स्किल्ससाठी रंगीत तालीम मानलं जातं. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री Jayant Chaudhary यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी 2027 मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स स्पर्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सुमारे 15,275 नोंदणीकृत उमेदवारांमधून विविध टप्प्यांतील चाचण्यांनंतर 54 सर्वोत्तम स्पर्धकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. आता 2026 मध्ये Shanghai येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेसाठी या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.
कोकणात जाणाऱ्यासाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 15-20 दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा थेट मनसेने दिला. पूर्वी दादर ते रत्नागिरी, अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे.
बिहारमध्ये दारूबंदी असली तरी तिथे अजूनही विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी अनेक लोकांची दृष्टी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचं निश्चित केलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा कि, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीचा मान ठेवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा? असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांमध्ये काय निर्णय घेणार? याकडे लक्ष राहणार आहे.
हार्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात तणाव आणखी वाढला असून, Iran ने अमेरिकेचं ए-10 लष्करी विमान पाडल्याचा दावा केला आहे. जगातील अत्यंत महत्त्वाच्या सामरिक मार्गांपैकी एक असलेल्या या भागात ही घटना घडल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. दरम्यान, United States च्या एफ-15ई लढाऊ विमानावरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानातील एका वैमानिकाला सुरक्षितपणे वाचवण्यात अमेरिकन लष्कराला यश आलं असून, दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर Iran कडून Israel वर हल्ले सुरूच आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेला हा संघर्ष जागतिक सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरत आहे.
Oil and Natural Gas Corporation (ONGC) च्या मुंबई हाय क्षेत्रातील SHP प्लॅटफॉर्मवर लागलेल्या आगीमुळे एकूण 10 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याने आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
आम आदमी पार्टीमध्ये सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. पक्षाचे हायप्रोफाईल खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यात आले असून. पक्षाचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज आणि राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनुराग ढांडा यांनी चड्ढा यांच्यावर थेट आणि अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. अनुराग ढांडा म्हणाले, "राघव, तुम्ही गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदींना घाबरत आहात. जो घाबरला तो देशासाठी काय लढणार?" संसदेत पक्षाला मिळणारा मर्यादित वेळ देशहिताच्या मुद्द्यांऐवजी "विमानतळ कॅन्टीनमध्ये समोसे स्वस्त करणे" यांसारख्या फालतू कामांसाठी वापरला जात असल्याचा टोला ढांडा यांनी लगावला.
दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा बळी गेल्यानंतर आज परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. मंत्री नरहरी झिरवळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता, संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. "या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण?" असा सवाल करत नागरिकांनी क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नरहरी झिरवळ रुग्णालयात पोहोचताच नागरिकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. विहिरीला संरक्षण कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर स्थानिकांनी झिरवळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. "जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर आज 9 जीव वाचले असते," असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ज्येष्ठ माओवादी नेते प्रशांत बोस (वय अंदाजे 80) यांचे शुक्रवारी राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथे उपचारादरम्यान निधन झाले. पश्चिम बंगालचे मूळ रहिवासी असलेले बोस यांना नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांच्या पत्नी शीला मरांडी यांच्यासह अटक करण्यात आली होती आणि ते तेव्हापासून कारागृहात होते. पुणे शहर पोलिसांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या एल्गार परिषद–भीमा कोरेगाव प्रकरणातही बोस हे आरोपींपैकी एक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कथित कटाचा उल्लेख असलेल्या “माओवादी कम्युनिकेशन”शी त्यांचा संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशातील वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंबेडकर यांनी पुढे आरोप केला की, ‘आत्मनिर्भर’च्या घोषणा करूनही देशांतर्गत गॅस साठवणूक व पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक गुंतवणूक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
खेलोबा मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर होणार असल्याने तसेच ही जागा मंदिर देवस्थानची असल्याचे बैठकीत मंजुर करण्यात आले. ही बैठक मराठा समाज प्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये शुक्रवारी रात्री पार पडली. दोन्ही समाजाने प्रशासनाला सहकार्य करत तोडगा काढल्याने अखेर शुक्रवारी रात्री खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आपले आंदोल मागे घेतले.
सांगलीथील राम मंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मध्यरात्री विना परवानगी हा पुतळा उभारल्याने सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचे नियोजन होते. आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते रविवारी त्रिकोणी बागेत भूमिपूजन होणार होते. त्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांनी राम मंदिर चौकात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे.पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांनी हा पुतळा तेथून हलवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.