विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी घोडेबाजार केल्याचा विरोधकांनी गंभीर आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात. निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांचं बिल आणल्यास आपण त्याचे स्वागत करू, असे मोठं विधान केलं आहे.
'विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावर भाजपने तोंड उघडायला लावू नये. घोडेबाजार झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे. फक्त पैशांच्या जीवावर कोणीही उड्या मारू नये. विधान परिषद निवडणुकीत कोणतीही रंगत नव्हती,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
ऊर्जा सुरक्षा दिशेने भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे. आता भारताला मोठा वायू साठा सापडल्यामुळे भारत इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भतेच्या दिशेने वाटलाच करु शकतो. अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा महत्त्वपूर्ण शोध लागला असून भारताच्या ऊर्जा सुरक्षा दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.
वादळी पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील कडगाव इथं घर कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. पत्र्याचा जबर मार लागल्याने समाबाई शिरसाट यांचा मृत्यू झाला. यात पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या 10 वर्षांमध्ये राजेश एक्सपोर्टसमध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, म्युच्युअल फडांनी गुंतवणूक केली नाही. मात्र, एलआयसीची गुंतवणूक गेल्या 10 वर्षात पाच पट वाढली आहे. राजेश एक्सपोर्टसच्या वेबसाईटवरील डेटाचा आधार घेत हे वृत्त समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. राजेश मेहता राजेश एक्सपोर्टस या कंपनीचे प्रमोटर आहेत. या कंपनीत 2016 मध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक 0.5 टक्के होती. गेल्या 10 वर्षात ती पूर्णपणे काढून घेण्यात आली.
NEET-UG पेपर लीक आणि देशातील इतर परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आज दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला एक मोठे आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके सकाळी अमेरिकेतून दिल्ली विमानतळावर दाखल झाला आहे. गेल्या एका तासाहून अधिक काळ तो विमानतळाच्या आतच असून, ते अजूनही बाहेर का आला नाही, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
रत्नागिरी-कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे समाज माध्यमांवरील स्टेटस चर्चेत आले आहे. काळ हा मोठा शिक्षक आहे, असं त्यांचे स्टेटस आहे. ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काल देखील बाळ माने यांनी स्टेटस ठेवलं आहे. बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा आहे. बाळ माने यांच्याकडून विनायक राऊत यांच्यावरती आरोप झाले होते.
उल्हासनगरच्या कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिस तपासात मोठा खुलासा झाला आहे. गोळीबार प्रकरणात फिर्यादी असलेल्या दीपक ठाकूर यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारापूर्वी अजय राव याला अडवून मारहाण करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
चंद्रपूर शहरातील कॅन्सर केअर फाउंडेशनचे (कॅन्सर हॉस्पिटल) मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा लॉक करून 1.23456 बिटकॉईनची खंडणी मागितल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 1 जूनला सकाळी आयटी विभागाला सर्व्हरमध्ये बिघाड आढळला. तपासणीदरम्यान सर्व्हरवर रॅन्समवेअरचा धमकीचा संदेश दिसून आला.
अभिजित दीपके यांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेल्याची अफवा पसरली होती. मात्र, जंतरमंतरवर आंदोलनासाठी पोलिसांनी आपल्याला परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्वांनी जतंर मंतर येथे जमण्याचे आवाहन देखील केले.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू माफियांविरोधात राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. २८ मे ते ४ जून या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ३१२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ हजार ७५७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९ कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
फुगेवाडी, दापोडी व हडपसर येथील प्रथमदर्शनी मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २९ मे ते ४ जून या कालावधीत धडक कारवाई करुन एकूण १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.
कॉक्रोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजित दीपके हे अमेरिकेवरून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आज सकाळी दाखल झाले आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांना विमानतळावर न येण्याचे आवाहन देखील केले होते.
बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कॉक्रोच जनता पार्टीकडून आज दिल्लीत जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करण्यात येत आहे. नीट पेपर फुटीबाबत शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनात जेनजी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेत जंतर-मंतर मैदानावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.