सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे आंदोलनाला राजकीय रंग चढण्याची चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तेलंगणा राज्य परिवहन प्रवासी बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांनी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरची काच फोडली. सुदैवाने चालक मल्लेश यादवने वेळीच ब्रेक लावल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग दीर्घकाळ बंद होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जेसीबी, क्रेन आणि कटरच्या मदतीने भलेमोठे झाड युद्धपातळीवर तोडण्याचे काम सुरू करण्यात आले.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीच्यावतीने अल्प दरात लाडू प्रसाद दिला जातो. यावर्षीच्या सोहळ्यासाठी मंदिर समितीकडून सुमारे 15 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार करण्यात आला आहे. तसेच एकादशीच्या दिवशी राजगिरा लाडू उपलब्ध करून दिला जातो. तोही जवळपास तीन लाख लाडू उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बुंदी लाडू प्रसादामध्ये यावर्षी सुख्या मेव्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच स्वच्छतेचे व अन्न व औषध प्रशासनाचे सर्व नियम पाळून हा बुंदी लाडू मंदिर समितीच्या लाडू प्रसाद केंद्रांमध्ये तयार केला जातो. यासाठी जवळपास 100 हून अधिक स्वयंसेवक काम करत आहेत.
नागपूर शहरात पोलिसांवर होणारे वाढते हल्ले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरातील वाहतूक पोलिसांसह सर्व पात्र पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता कर्तव्यावर असताना 'सर्व्हिस गन' म्हणजेच पिस्तूल बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश गुरुवारी संपूर्ण पोलिस दलाला देण्यात आले आहेत.
शेअर बाजारात आज चौफेर खरेदी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतून मिळत असलेल्या चांगल्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही मुख्य निर्देशांक सेंसेक्स आणि निफ्टी-50 शानदार वाढीसह उघडले. व्यवहार सुरू होताच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी पुन्हा एकदा 24,100 च्या पार गेला असून, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बाजाराच्या या सुरुवातीच्या तेजीला प्रामुख्यानं आयटी (IT) आणि फायनान्शियल क्षेत्रातील शेअर्सकडून मजबूत पाठबळ मिळत आहे.
मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील शतकभर जुने आणि प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर एफडीएने कारवाई करत संस्थेचा परवाना निलंबित केला आहे. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानले जाते. मात्र, तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे FDA ने ही कारवाई केली.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषण आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यांना देशभरातून पाठिंबा वाढत आहे. यातच '3 इडियट्स' सिनेमात आमिर खाननं साकारलेलं 'रँचो' हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचं बोललं जातं. आता सुपरस्टार आमिर खाननंही या विषयावर भाष्य केले आहे. आमिर खान म्हणाला की, "नाही. ते खरं नाही. उलट, हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा सिनेमा बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी नुकताच अभिनेता ओमी वैद्य याचा एक व्हिडिओ पाहिला, ज्यात त्यानं तसं म्हटलं. पण ते तसं नाही. त्याचा गैरसमज झाला आहे. चतुरला कदाचित तसं वाटलं असेल, पण मला हे स्पष्ट करायचंय की, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी किंवा मी, आमच्यापैकी कोणालाही त्या वेळी सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती."
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. तिघांनी एकत्र भेट घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एनडीए सोबत चर्चा समोर येत आहे. अशा परिस्थितीत या तिघांनी घेतलेली एकत्र भेटी मागे जयंत पाटील यांचा भाजप की ने काही घडामोडी घडत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. त्यावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत याची हवाच काढून टाकली आहे. तिघे एकत्र जाण्यामागे वेगळे काही कारण असेल असे वाटत नाही. त्यांचे काहीतरी सामायिक काम असेल. अन्यथा, कुणाला सोबत घेण्याबाबतचा प्रस्तावच आमच्यासमोर नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले.
राज्य सरकारने महिलांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. सरकारने आता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली एक मोठी योजना बंद केली आहे. शिंदे यांच्या सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारक (रेशनकार्ड) कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची 'कॅप्टिव्ह मार्केट योजना' सुरू केली होती. मात्र ही योजना आर्थिक भार सोसत नसल्यामुळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय वस्त्रोद्योग विभागाने जारी केला आहे.
महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह धरला जातो. ग्राहकांचा विरोध असतानाही मीटर बसविण्याच्या तक्रारी आहेत. या प्रश्नावर सटाण्यात वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सटाणा येथे स्मार्ट मीटर विरोध होत आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने वीज ग्राहक आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले.
नाशिक महापालिकेत स्टार रेट नावाखाली कंत्राटदारांवर 200 कोटी उधळण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाची आज महासभेत कसोटी लागणार आहे. या प्रस्तावविरोधात बाजप आक्रमक आहे. इराक-अमेरिका युद्धामुळे डांबरीकरणाच्या दरात वाढ झाली. त्यामुळे कंत्राटदाऱ्यांना स्टार रेट म्हणून निधी अदा करणे हा विषय आहे.
पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे मुख्यमंत्र्यांसोबत तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या झालेल्या भेटीबद्दल सुमित्रा पवार यांना कळवले नव्हते त्यामुळे पक्षात नाराजी असल्याचं दिसून आलं होतं या प्रकरणावरून स्वतः सुमित्रा पवार देखील नाराज होत्या. त्यामुळे महायुतीमध्ये ही नाराजी योग्य नसल्याचे मत पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळांसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेला आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केला आहे.
लोणावळा ग्रामीण परिसरातील एकवीरा देवी मंदिर, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा व तुंग किल्ले, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण आदी पर्यटनस्थळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कलम १६३ लागू करण्यात आले होते.
वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेस अखेर आपली भूमिका स्पष्ट करत त्यांना थेट पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केल आहे.
उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.20 जुलैला ते दौऱ्यावर जाणार आहेत. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुषमा अंधारेंनी यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.