सोयगावातील जरंडी परिसरात आज दीडतास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिसरातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती. जरंडी जवळील ग्रामपंचायतीची घंटा गाडी पुराच्या पाण्यात वाहून जातांना ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी वाचवली तर एका इसमाची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली सुदैवाने ग्रामस्थांनी मोटरसायकलस्वाराचे प्राण वाचविले.
पुणे : शहरात बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य वस्तीसह उपनगरांतील रस्त्यावर सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने; तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर काही महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.
गणेशखिंड रस्ता, पुणे स्टेशन, डेक्कन, आरटीओ चौक आणि शनिवार वाडा परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा वापर केला. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता यांसह विविध भागात सकाळपासूनच वाहतूक कोंडी आहे. सकाळी आठ ते १२ दरम्यान वाहतूक मंदावली होती. त्यानंतर पावसाचा जोर आणि रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली होती. प्रमुख रस्त्यावर कोंडी झाल्याने वाहनचालकांनी गल्ली बोळातील रस्त्याने इच्छित स्थळी जाण्यास सुरवात केली. त्यामुळे छोट्या रस्त्यांवर वर्दळ वाढून त्यावर देखील टप्प्या-टप्प्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नवी मुंबई विमानतळावर भाजपने लक्षवेधी आंदोलन केले. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, म्हणून हे लक्षवेधी आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. या वेळी आम्हाला आमच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्यांनी दिलेला शब्द मोडला जाणार नाही. कोणत्याही स्थितीत आमचा आग्रह कायम आहे आणि राहील. मात्र आपल्याच सरकार विरोधात आपल्याला आंदोलन करण्याची वेळ का आली याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना आम्ही लक्ष वेधत आहोत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आज जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. जालना शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांकडून आणि सामान्य नागरिकांकडून जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांनी एक-एक रुपयांची भीक मागत हे अनोख आंदोलन करण्यात आलं. शिवाय या सहाही खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेधही नोंदवला. दरम्यान संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा आम्ही राबवणार असल्यासही पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याने जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणी वर्धन करुन ते आता 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय झाले असून रूग्णालय संलग्न कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामासाठी पुरवणी मागणीद्वारे 26.84 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये ही तरतूद करण्यात आल्याने जामखेड आणि परिसरातील रहिवाशांसाठी 100 खाटांच्या सुसज्ज उपजिल्हा रूग्णालय उभारणीच्या कामास गती मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर तब्बल 1100 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. येत्या 30 जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशा स्थितीत लालफितशाहीत अडकलेल्या या भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या 400 कंत्राटी शिक्षकांमार्फत काम भागविले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी दिली.
आम्ही विरोधात असताना आम्ही जे भोगल ते आता दुसऱ्या विरोधकांनी भोगू नये, ही वेळ येऊ नये, यासाठी आम्ही नक्की बोलू, आवाज उठवू, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वक्तव्याने महायुती सरकार विरोधकांना पक्षात घेण्यासाठी चोही बाजूने कोंडी करत असल्याचे पुढे आले आहे. आता राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. राजकारणाची व्याख्या बदलून गेली आहे. जैसा देश वैसा भेस, असेच चालावे लागणार आहे, असेही खासदार आष्टीकर यांनी म्हटले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. तसेच पर्शियन आखातातील भारतीय जहाजांच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) परिस्थितीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या टिप्पणीचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "शेजारी देशाची अशी टिप्पणी म्हणजे त्यांचे स्वतःचे अपयश लपवण्याची आणि त्यांच्या देशातील मानवाधिकारांच्या पायमल्लीवरून जगाचे लक्ष हटवण्याची धडपड आहे," अशा कडक शब्दांत रणधीर जैस्वाल यांनी पाकिस्तानला सुनावले.
अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळल्यानंतर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला 'होर्मुझ स्ट्रेट' अखेर जहाजांच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या भागात सध्या 10 भारतीय जहाजे सुरक्षितपणे प्रवास करत असून, भारताकडे येणारी 11 जहाजे हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून पुढे मार्गस्थ झाली आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिप्ला येथील सेशन्स कोर्टाने 'आप'चे आमदार चैतर वसावा आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 9 जणांना वन अधिकाऱ्यांवर हल्ला आणि खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोषी ठरवत 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेमुळे आता चैतर वसावा यांची आमदारकी धोक्यात आली आहे. हे प्रकरण ऑक्टोबर 2023 मधील आहे. आमदार वसावा यांनी शस्त्रातून हवेत गोळीबार (फायरिंग) केल्याचाही आरोप होता. यानंतर वन अधिकाऱ्यांकडून 60 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती.
मुंबईत मुसळधार पावसाने जोर पकडल्याचे दिसत आहे. वसई विरार शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची धोकादायक झाडे कोसळली आहेत. आगाशी, राजोड़ी, उमराला, दिवानमान या ठिकाणच्या रस्त्यावर झाडे पडल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वसई विरार महापालिकेने ही धोकादायक झाडे तशीच ठेवल्यामुळे ती झाडे कोलमडून पडू लागली आहेत.
मान्सून मंगळवारी मुंबईत दाखल होताच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा 12 ते 13 दिवस उशिराने आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. मान्सून दाखल होताच हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 3 तासांत मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विष्णू चाटे चा मुक्काम जिल्हा कारागृहात वाढ
पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आरे कॉलनी परिसरात एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे
पावसामुळे अनेक ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली आहे. ठाणे ते पनवेल लोकल सेवा तब्बल १ तासाने सुरु झाली आहे. पहिली गाडी ठाण्याला रवाना झाली आहे.
Maharashtra Rain Update : पुढील काही तास पावसाचा जोर असेल,
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. आज सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.