दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी आहे. मात्र, विरोधी पक्षातील काही नेते या आंदोलनात घुसून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
'हा 'तिरंगा मार्च' आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्च्याचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही.', असे देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईसाठी एक नवीन अध्याय सुरु केला आहे. या तरुणाईला दिशा द्यायला आशा आकांक्षा पूर्ण करायला. मोदीजी (PM Modi) हा नवा अध्याय लिहत आहेत. त्यातही पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते शनिवारी पहाटे पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा नागपुरातील वकिलांकडून निषेध केला आहे. विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी नागपुरातील वकिल मंडळींनी पुढाकार घेतला आहे.
राज्यात यंदा सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पुण्यात २१ जुलै पर्यंत डेंग्यूचे ३७६२, तर हिवतापाचे २०३६ रुग्ण आढळून आले आहेत
१३ किलोमीटर मार्गावरील मेट्रोच्या सर्व वैधानिक चाचण्या यशस्व झाल्या आहेत. प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकण्यात येत आहे. हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला होणार आहे.
आषाढी एकादशी निमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात पूजा झाली. यावेळी फडणवीसांनी शेतकरी, पंढरपूर कॉरिडोअर, जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन याबाबत सविस्तर भाष्य केले. पंढरपूर कॉरिडोअरचं काम यावर्षी सुरु झाले पाहिजे. त्यासाठी दोन-अडीच वर्षे लागतील. या कामाविषयी 80 ते 90 टक्के लोकांच्या शंका दूर झाल्या आहेत. उर्वरित लोकांच्या शंकाही दूर होतील. कॉरिडोअर पूर्ण झाल्यावर पंढरपूर नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणार्या प्रत्येक व्यक्तीला पांडुरंगचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.