दोन वर्षांपूर्वी वीस लाख रुपयांचे भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले. त्याबाबत भेसळीचा नमुना बेंगलोर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला. मात्र गेल्या दोन वर्षात त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळे हे भेसळयुक्त तेल व्यापाऱ्याला परत करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आमदार आमशा पाडवी यांनी केला. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. यावर सरकारने कारवाईच्या आश्वासन दिले. त्याचा पाठपुरावा देखील झाला. मात्र प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. बंगरूळू येथील प्रयोग शाळेतून अहवाल येण्यास किती दिवस लागतात? दोन वर्षात देखील अहवाल येत नसेल तर सरकार काय करीत आहे?
शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये अवघ्या काही सेकंदांच्या अंतराने दोन मोठे भूकंप झाले. पहिल्या भूकंपाची तीव्रता ७.२ होती, तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी नोंदवली गेली. अनेक इमारती कोसळल्या असून लोक घाबरून घराबाहेर रस्त्यावर आले आहेत. गृहमंत्री डायओसदादो कॅबेल्लो यांनी लोकांना आपली घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. 'यूएस जिओलॉजिकल सर्व्हे'च्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा १०,००० च्या वर जाण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल आज गुरुवारी लागणार आहे. राज्यातील जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिलाच खटला ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.