"विरोधकांनी कांदा दरावर आंदोलन केलं, त्याचे स्वागत आहे. मात्र काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हेच हाल झाले. सत्तेच्या बाहेर असल्यावर शेतकरी आठवायचा आणि सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना दूर करायचं असं होता कामा नये. मंत्री गिरीश महाजन जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी कापसाला सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मागितला होता. त्याला दहा वर्ष झाले. मात्र सत्तेत आल्यावर ते शांत बसले," असा घणाघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला.
नाशिकच्या चांदवड इथल्या मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विराट क्रांती महामोर्चा काढलाय. कांद्याला प्रति क्विंटल किमान 2 हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखलाय. या मोर्चामध्ये ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सहभागी झालेत. मेलोडी चॉकलेट वाटत शेतकऱ्यांनी निषेध केला.
चांदवडमध्ये आंदोलनादरम्यान गोंधळ झाला आहे. यामुळे चांदवड चौफुलीवर मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे, शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतला असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे आहे. उद्या याबाबत दिल्ली येथे बैठक होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली, या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंवर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सी आणि कॅब चालकांककडून भाडेवाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीसह सीएनजीचे दर वाढल्याने विविध शहरांतील टॅक्सी, ऑटो चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.
सीएनजी मंगळवारपासून (ता.२६) गॅस दोन रुपयांनी महागला आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 81.09 रुपयांवरून 83.09 रुपये इतके झाले आहेत.
पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे.
भोंदू अशोक खरातनंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अघोरी पूजेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप भोंदू कमलेश अधिकारीवर आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.