Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : संसदेत विरोधकांचा गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब

Marathi Breaking Live Headlines Updates: केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार..., यासह आज दिवसभरातील देशासह, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

संसदेत विरोधकांचा गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब

पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळाचे वातावरण कायम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेतील नियमित कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणातून विसर्ग, मुसळधार पावसामुळे अनेक धरणं भरली

नाशिकच्या पूर्व भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरून वाहतायत... यामुळे नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय... सध्या 46 हजार 227 क्युसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने सोडले जातंय... धरणात पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केलंय...

विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कोणी दिले? राऊतांचा सरकारला थेट सवाल

विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश नेमके कोणी दिले, असा थेट प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

NEETनंतर MPSC परीक्षेवरही पेपरफुटीचे आरोप; आयोगाने दिले स्पष्टीकरण

MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप समोर आला आहे. परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा तसेच गुणांमध्ये विसंगती असल्याचा दावा करत दोन उमेदवारांनी तक्रार केली आहे. मात्र, आयोगाने हे आरोप फेटाळून लावत प्रकरणाची पडताळणी सुरू असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

MPSC भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत २ उमेदवारांची FDA कडे तक्रार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत २ उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

अजित पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने बाळासाहेब पिंगळे अडचणीत

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवगंत अजित पवार जयंतीचा कार्यक्रम वादात सापडला आहे. सत्ताधारी गटाचे बाळासाहेब पिंगळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या विषयी आपत्तीजनक विधान केले. हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. मविप्र संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जयंती कार्यक्रम झाला. यावेळी बाळासाहेब पिंगळे यांनी अजित पवार यांच्या विषयी अवमानजनक विधाने केले. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर बाळासाहेब पिंगळे यांच्यावर चांगलीच टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंगळे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पिंगळे यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने काल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या विरोधातील लोकशाही लढ्यासाठी उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि संघर्षासाठी अखंड बळ लाभावे, अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा चे कार्यकर्ते आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा केली...

महिला सुरक्षेसाठी १० कलमी कृती आराखडा लागू होणार

महिला सुरक्षेसाठी १० कलमी कृती आराखडा लागू होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘कॅटॅलिस्ट्स फॉर चेंज’ कार्यक्रमात माहिती देण्यात आली आहे. महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानता अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा लागू करण्यात येणार आहे. २४ ते २६ या तारखेदरम्यान या प्रशिक्षण शिबिरात देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ट प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी महिलांच्या प्रश्नांकडे संवेदनशील, उत्तरदायी आणि सक्रिय दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची शक्यता

राज्यात एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे. एसआयआर मोहिमेनंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगास विनंती केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ७५४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरीत, तसेच बोगस मतदारांची नावे वगळून अद्ययावत होणारी मतदार यादीचा वापर होणार आहे.

केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार

ज्या पेपरफुटी प्रकरणावरून देशाचं राजकारण ढवळून निघालं त्या पेपरफुटी प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार आहे. या प्रस्तावित कायद्याअंतर्गत परीक्षांचे पेपर लीक करणे किंवा संघटित कॉपी संस्था चालवणाऱ्या दोषींना ५ ते १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५० लाख रुपयांपासून ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांची जलद चौकशी करण्यासाठी विशेष कृती दल (STF) आणि विशेष जलद गती न्यायालये (Fast-Track Courts) स्थापन करून ३ महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता टिकून राहील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT