मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्युअल, कर्की फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि वरणगावजवळील तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवत 9 ऑक्टोबरच्या रात्री दरोडा टाकण्यात आला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून सशस्त्र दरोड्याप्रकरणी सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे. ज्यात एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे विशएष म्हणजे मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंप हा केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा आहे.
आरपीआय नेता व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याने निर्माण केलेले गुन्हेगारी साम्राज्यावर महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालवला. लोंढे याच्या भुयार असलेली दोन मजली इमारत महापालिकेनी पडली. पण आता एवढी मोठी इमारत उभी राहत असताना महापालिकेने त्याकडे कानाडोळा का केला? या अनधिकृत इमारतीला वीज, पाणी आणि अन्य सर्व सुविधा कशा देण्यात आल्या. यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता का असे सवाल उपस्थित होत आहेत. तर या कर्माचाऱ्यांचा शोध प्रशान घेऊन कारवाई करणार का? असेही सवाल आता विचारले जात आहेत.
तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले असून त्यांनी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी, ही देना बैंक आहे लेना बैंक नाही असे म्हणत शिवसेनेवर निशाना साधला. तसेच ज्या पद्धतीने रत्नागिरीच्या विकासासाठी निधी दिला तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिला जाईल. अन्याय केला जाणार नाही असेही आश्वासन दिले आहे.
पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशनसमोर आम आदमी पार्टीने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर सरकारचा निषेध करत आंदोलन केले. गुन्हेगारी, खंडणी, मारामारी आणि गॅंगवॉर सारखे गुन्हे पुण्यात वाढत असताना राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण यामुळे सामान्य पुणेकर भयभीत झाल्याचा दावा आपने केला असून 'पुणेकरांनी जगायचं कसं?' असा सवाल आंदोलकांनी केला आहे.
दाऊदच्या रत्नागिरीतील जनिमींचा लिलाव 4 नोव्हेंबरला होणार आहे. मुम्बके गावातली ही जमीन पुन्हा लिलावात आल्याने या लिलावातून सरकारला 20 लाखांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. साफेमा कायद्याअंतर्गत हा लिलाव होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तस तशा भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुका लढवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी तब्बल तीन ते चार इच्छुक भाजपकडून निवडणुकीचे तयारी करताना पाहायला मिळत आहे.
अमरावतीत दिवाळीच्या तोंडावर नकली नोटा बाजारात चलनात आल्या असून नांदगाव पेठ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तिघाना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल 26 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. आणखी एक आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य 'मविआ' प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेच्या समावेशाला तीव्र विरोध दर्शवला होता. सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे आणि त्यांच्या विरोधाला न जुमानता, संजय राऊत यांनी आता त्यांच्याविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे बोलले जात आहे.
मविआ नेत्यांच्या निवडणूक आयोगाच्या भेटीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. खासदार संजय राऊतांनी त्यावर फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांसारखा गोंधळलेला आणि कन्फ्यूज मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही असं संजय राऊतांनी म्हटलं आहे..निवडणूक याद्यातील घोळ समोर आणला यात कन्फ्यूज काय असा सवालही त्यांनी विचारला.
राज्याचे क्रीडामंत्री व राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली संस्थाचालक आणि जिल्ह्यातील दूध संस्था व दूध उत्पादक आपल्या गायी व म्हशींसह शासकीय विश्रामगृहापासून ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. मात्र, मोर्चामध्ये कोणतेही जनावरे आणू नका अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. पण त्यानंतरही दूध उत्पादकांनी जनावरे आणल्याने पोलिसांनी ही जनावरे हटवण्याची केली मागणी. आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी दबावाचा वापर करत जनावरे मोर्चातून बाहेर काढली.
गोकुळच्या मोर्चात आंदोलन आणि पोलिसांच्या झटापट
मोर्चात जनावरे आणल्याने पोलिसांकडून जनावरे हटवण्याचा प्रयत्न
त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांच्या झटापट झाली आहे.
डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर आक्रमक झालेल्या संस्थाचालकांचा गोकुळवर आज मोर्चा काढण्यात आला आहे.
यंदा दिवाळी साजरी करणार नाही, पवार कुटुंबियांचा मोठा निर्णय घेतला असून, सुप्रिया सुळेंनी याबाब ट्विट करत माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. ते १३,४३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते कुर्नूल येथे होणाऱ्या सुपर जीएसटी-सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमातही सहभागी होतील, ज्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना आमंत्रित केले आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भाजपने पक्षाचं मोठं भव्य असं कार्यालय उभारलं आहे. असचं कार्यालय आता मुंबईतही उभारलं जाणार आहे. या नव्या प्रदेश कार्यालयाचं 18 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये महाएल्गार सभा होणार आहे. या सभेची तयारी आता बीडमध्ये वेगाने सुरू असून गावोगाव बैठका घेतल्या जात आहेत. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, आमदार, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाके उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक सुभाष राऊत यांनी दिली आहे
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.
नवी मुंबई महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन 2024 - 25 या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना 28,500 आणि आशा वर्कर यांना 18,500 रुपयांचा रक्कमेचे सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
चितळे उद्योग समूहाने पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत दिली आहे. चितळे उद्योग समूहाने आपली सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटीची मदत केली. या मदतीचा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर दिलीप पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीची आहे. राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि राजकारणामध्ये अशी टीकाटिप्पणी करणे योग्य नाही, असं मतं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. राज्य महिला आयोगाकडे तक्रार झाली असती तर टीका करणाऱ्यांना नोटीसा पाठवली असती असंही त्या म्हणाल्या
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.