उद्धव ठाकरेंच्या यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार अपात्र ठरत होते, कारण त्यांनी पक्षांतर केले होते. पक्षांतराचा फायदा मिळू नये, म्हणून त्यांना अपात्र करायला हवे होते, असा युक्तिवाद कामत यांनी केला.
मुंबईत आरटीओकडून रिक्षा आणि टॅक्सीचालकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांना नोटीस दिली जात आहे. महिनाभरात त्यांना मराठी बोलता न आल्यास काही कालावधीसाठी परवाना निलंबित केला जाणार आहे.
काँग्रेसच्या कार्यकारिणीने वंदे मातरम् ची दोनच कडवी गाण्याचा ठराव केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानविरोधी भूमिका स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.
राज्यातील विद्यार्थिनींसाठी सरकारकडून महत्त्वाचा विचार सुरू आहे. ‘कमवा आणि शिका’च्या धर्तीवर विद्यार्थिनींना दरमहा 2 हजार रुपये पॉकेटमनी देण्याचा प्रस्ताव आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. CSRच्या माध्यमातून योजना राबवण्याचा प्रयत्न असून, निर्णय झाल्यास सुमारे 12 लाख विद्यार्थिनींना लाभ मिळू शकतो.
पेपरफुटीमुळे रद्द झालेली TET परीक्षा ऑनलाइन घेण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. यंदा परीक्षा न झाल्यास पुढील वर्षी तीन वेळा परीक्षा घेण्याचा पर्याय असल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली आहे.
ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस असल्याचा दावा राऊतांनी केला. तसेच 17 सप्टेंबरनंतर मोदींबाबत नेमकं काय होणार, हे देशाला कळेल, असंही राऊत म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. देशवासीयांनी या निर्णयाविरोधात एकत्र येऊन विरोध दर्शवावा असे आवाहन त्यांनी केले असून भाजप याला जोरदार विरोध करेल.
लातूर येथील औसा तालुक्यातल्या उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची अभिजीत दिपके यांनी स्कूल ठीक करो या अभियानांतर्गत पाहणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांची त्यावेळी संवाद साधत आहेत. शाळेत असलेल्या अपुऱ्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता याविषयी ते सोशल ऑडिट करत आहेत.
नाशिकच्या हरिहरगड पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि निसरड्या पाय-यामुळे प्रशासनाचा हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले
मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी सुविधा घेऊन २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मराठी भाषेच्या नियमाला विरोध करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मराठी शिकण्याच्या नियमाला विरोध करणाऱ्या चालकांना मनसेच्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.
धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. धाराशिव-कळंब महापालिकेतील तब्बल १० नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहण्याच्या तक्रारी आता कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांची GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मंगळवारी लेखी आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडेल. आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या युक्तिवाद संपेल, त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करणार आहेत.