ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या पश्चिम भागात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरिकांसह भाजप नगरसेवक उमेश पाटील आणि किरण राठोड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पाणी येत नसल्याने आम्ही पाण्याचे बिलही भरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
हिंगोली पुन्हा एकदा भूकंपाचा हादरला बसला आहे. आज सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी भूकंपाचा हादरा बसला आहे. 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद झाली आहे. वसमत औंढा व हिंगोली शहरातही भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुंबईतील जोगेश्वरीमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. महापालिकेच्या नवनिर्मित 'के/उत्तर' विभाग कार्यालयात पहिल्याच पावसात स्लॅब कोसळलाय. सुदैवानं या दुर्घटनेत कर्मचारी थोडक्यात बचावलेत.कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अवघ्या 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...
लातूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे... रेणापूर तालुक्यातील खरोळामध्ये शेतातील बोरची वायर चोरल्याचा आरोप करत काही लहान मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आलीय... या क्रूर मारहाणीचा समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय... याप्रकरणी रेणापूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे वायर चोरीच्या आरोपाखाली या लहान मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय...
जुन्या कसारा घाटात मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडलीये. रस्त्याखालील मातीचा भराव वाहून गेल्याने संरक्षण भिंत कोसळली असून महामार्गाला भेगा पडल्याय. प्रशासनानं तातडीने सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावून या मार्गावरील वाहतूक एकेरी केलये. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय...
शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे अत्यंत गोपनीय फोटो अखेर समोर आले आहेत. 17 जूनला ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी त्यांना भेटल्याचे दिसत आहे. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे देखील या खासदारांसोबत उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
कॅगने राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर आक्षेप नोंदवताना २०२४-२५ या आर्थिक वर्षअखेर राज्याचे अर्थसंकल्पबाह्य कर्ज २८ हजार ३२५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ताशेरे ओढले आहेत, ही कोट्यवधी रुपयांची देणी राज्याच्या अधिकृत अर्थसंकल्पी कागदपत्रांमध्ये न दाखवल्याने राज्यावरील एकूण कर्जाचा बोजा कमी दिसतो विधिमंडळाच्या अपरोक्ष हे करण्यात आले असल्याचा आक्षेपदेखील नोंदविण्यात आला आहे.
दहशतवादी संघटनेची सोशल मीडियावरून संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर राज्यभरातील पथकांनी एकाच वेळी कारवाईला केली.दरम्यान कोल्हापूर, कवठेमहांकाळ तासगाव मधील चौघांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. या चौघांनाही शहर न सोडण्याचे फक्त सूचना देण्यात आले आहेत.
: शनिवारी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. मात्र, अधिवेशनानंतर सत्ताधारी पत्रकार परिषद घेत असतात विधीमंडळातील ही अलिखित परंपराच आहे.मात्र, यंदा पत्रकार परिषद न झाल्याने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले जात आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजले. या अधिवेशनात १५७ तास कामकाज झाले.या अधिवेशनामध्ये अनेक विधेयके आली आणि त्यावरती चर्चाही झाली. काही विधेयकं घाईघाईमध्ये मंजूर देखील झाली.
ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान झाले. या सोहळ्यामुळे वाहतूकमध्ये बदल करण्यात आले आहे. हडपसर येथून पुण्याकडे येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.